शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

‘इंडिया’चे नाव तडकाफडकी बदलू नये - राजू शेट्टी 

By अशोक डोंबाळे | Updated: September 8, 2023 18:42 IST

सांगली : आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. या नावावरून ...

सांगली : आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. या नावावरून लगेच तडकाफडकी देशाचे नावात बदल करून ‘इंडिया’चे भारत करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही नाव बदल्यामुळे सर्व कागदपत्रांसह चलनी नोटा, नाणी बदलावी लागणार आहेत. नोटबंदीच्या त्रासातून आजही जनता सावरली नाही, तोपर्यंत नवीन त्रास जनतेला देण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला.काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापना केली आहे. याला विरोध करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने ‘इंडिया’चे भारत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल राजू शेट्टी यांना भूमिका विचारली. यावेळी राजू शेट्टी सांगलीत शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, भारत नावाचा सर्वांना अभिमान आहेच, पण तडकाफडकी नाव बदलू नये. त्याला तांत्रिक अडचण आहे. यासाठी पैसाही प्रचंड लागेल. भारत हे अधिकृत नाव झाल्यानंतर सर्व चलनी नोटा, नाणी बदलावी लागतील. नोटबंदीचा एकदा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. सरकारला पुन्हा तो त्रास द्यायचा आहे का ? इंडिया हे नाव बदलल्यानंतर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाव बदलण्यासाठी सहमती घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, ऊस वाहतूकदार संघटनेचे संदीप राजोबा आदी उपस्थित होते.‘स्वाभिमानी’ स्वतंत्रच लढणारकेंद्र आणि राज्य सरकार हे शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे. या सरकारला तीव्र विरोध करण्यात विरोधकही अपयशी ठरले आहेत. सत्ता कुणाचीही असली तरी त्यामध्ये साखर कारखानदारांची लॉबी आहेच. हे कारखानदार शेतकऱ्यांचे कधीच हित पाहणार नाहीत. म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांबरोबर न जाता राज्यात स्वाभिमानी पक्ष स्वतंत्रच लढणार आहे. मी स्वत: हातकणंगले लोकसभा आणि सांगलीसह अन्य मतदारसंघांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार निश्चित करणार आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

रविकांत तुपकर स्वाभिमानी बरोबरचबुलढाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांनीच संघटनेबरोबर असल्याचा खुलासा केला आहे. तुपकरांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे. ते संघटनेत लवकरच सक्रीय सहभागी होती, असेही राजू शेट्टी म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार