शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Sangli News: म्हैसाळ उपसा योजनेचे पंप येत्या शुक्रवारपासून सुरु होणार, पालकमंत्र्यांचे आदेश 

By संतोष भिसे | Updated: January 17, 2023 18:48 IST

जानेवारी उजाडताच सांगली जिल्ह्यात पाणी टंचाईचे ढग दाटू लागले

सांगली : म्हैसाळ उपसा योजनेतून शुक्रवारपासून (दि. २०) पाणी सोडण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. जलसंपदा विभागाने त्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिल्या.जानेवारी उजाडताच जिल्हाभरात टंचाईचे ढग दाटू लागले आहेत. विशेषत: पूर्व भागातील मिरज, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आदी तालुक्यांतील पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत होते. त्याची दखल खाडे यांनी घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शुक्रवारी पंप सुरु करण्याच्या सूचना केल्या. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रासनकर आदी उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पंप सुरु केले जातील. थकबाकी व चालू पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी दिले जाईल. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज व पाणीपट्टी तातडीने भरावी.

थकबाकी ९८ कोटींवरम्हैसाळ योजनेची गेल्या आवर्तनासह एकूण थकीत पाणीपट्टी ९७ कोटी ७४ लाखांवर पोहोचली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपट्टीपैकी ८१ टक्के हिस्सा शासन भरते, तर फक्त १९ टक्के पैसे शेतकऱ्याने भरायचे आहेत. तरीही पैसे भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने २३ हजार ४९४ रुपये प्रतिदशलक्ष घनफूट इतकी पाणीपट्टी निश्चित केली आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारादरम्यान, योजनेचे आवर्तन सुरु न केल्यास सोमवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्यांसह लाक्षणिक उपोषणाचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील आदींनी दिला आहे. यावेळी महादेव गुंडेवाडी, विष्णू पाटील, गणेश देसाई, अविनाश पाटील, अर्जुन कदम आदी शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना त्यांनी निवेदन दिले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी