शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

दराचा नाही पत्ता, तरीही कारखान्यांचे हंगाम सुसाट; सांगली जिल्ह्यातील १९ पैकी १४ धुराडी पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 12:28 PM

काही कारखान्यांनी दोन ते तीन टप्प्यामध्ये एफआरपी द्यावी लागेल, असे खासगीत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रश्नावरुन कारखाना व संघटना यांच्यात यंदाही संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सांगली : जिल्ह्यातील १९ पैकी १४ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत. पाच कारखान्यांचे हंगाम यावर्षीही बंदच राहणार आहेत. वसंतदादा कारखाना चालवत असलेल्या दत्त इंडिया कारखान्याने ऊसदर जाहीर केला आहे; पण उर्वरित कारखान्यांनी दर जाहीर न करताच हंगाम सुसाट सुरू केले आहेत.जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याबाबत व्यवस्थापनांनी तयारी केली होती; पण पाऊस आणि दिवाळीमुळे ऊसतोड मजूर वेळेत आले नाहीत. यामुळे दिवाळीनंतरच हंगाम सुरू झाले आहेत. राजारामबापू कारखान्याची साखराळे, वाटेगाव, जत, कारंदवाडी ही युनिट, क्रांती, हुतात्मा, दालमिया (निनाई), विश्वास, मोहनराव शिदे, दत्त इंडिया, सोनहिरा, उदगिरी शुगर, सद्गुरु श्री श्री रविशंकर, श्रीपती शुगर ॲण्ड पॉवर आदी १४ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत.यापैकी दत्त इंडियाने प्रतिटन २९६१ रुपये ऊसदर जाहीर केला आहे. उर्वरित एकाही कारखान्याने दराची अधिकृत घोषणा केलेली नाही. शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. काही कारखान्यांनी दोन ते तीन टप्प्यामध्ये एफआरपी द्यावी लागेल, असे खासगीत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रश्नावरुन कारखाना व संघटना यांच्यात यंदाही संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

५ नोव्हेंबरनंतर ऊस तोडी बंद पाडणार : महेश खराडेगाड्या अडवणे, कारखाने बंद करणे, टायर फोडणे आदी करण्याची वेळ साखर सम्राटांनी आमच्यावर आणू नये. कारखानदारांनी दि. ४ नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करावेत, अन्यथा पाच नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ऊसतोडी बंद पाडण्यात येणार आहेत, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने