शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

सिंचन योजनांना वीज दरवाढीचा ‘शॉक’, पाणीपट्टीही वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 8:22 AM

वीजबिल भरणे मुश्कील

प्रताप महाडिक, लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव (जि. सांगली) : ताकारी, टेंभू, म्हैसाळसह राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनांना एप्रिलपासून वीज दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे. पूर्वी प्रतियुनिट १ रुपया १६ पैसे दराने होणारी वीजबिलांची आकारणी एप्रिलपासून ५ रुपये २६ पैसे दराने केली जात आहे. वीजबिलात तब्बल पाचपट वाढ झाल्याने योजनांची पाणीपट्टीही वाढणार आहे.

शासनाने सिंचन योजनांसाठी १ मार्च २०१८ पासून वीजबिलाचा ८१-१९ फॉर्म्युला लागू केला आहे. यानुसार ८१ टक्के वीजबिल जलसंपदा विभागाने, तर १९ टक्के वीजबिल व पाणीपट्टी शेतकऱ्यांनी भरायची आहे. मात्र, वीजबिलात पाचपट वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न आणि पाणीपट्टीचा ताळमेळ बसवण्याची कसरत होणार आहे. 

एक टीएमसी पाण्यासाठी १० कोटी 

ताकारी व टेंभू योजनेसाठी एक टीएमसी पाणी उचलण्यासाठी १ रुपया १६ पैसे दराने ३ कोटी २६ लाख रुपये वीज बिल येत होते. आता ५ रुपये २६ पैसे दराने यासाठी १० कोटी ५० लाख रुपये वीजबिल येणार आहे.