शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्लीतील सत्ताधीशाकडून देश तोडण्याचे काम, योगेंद्र यादवांची भाजप सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 13:31 IST

कोरोनामुळे देशातील ९७ टक्के कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या उलट देशातील एका उद्योगपतीची संपत्ती मात्र वाढत गेली.

सांगली : दिल्लीत खुर्चीत बसलेले लोक देश तोडण्याचे काम करीत आहेत. देशात बलात्कार, खून करण्याचा सन्मान होत आहे. महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त असताना राज्यकर्ते धर्माधर्मांत भांडणे लावण्याचा उद्योग करीत असल्याची टीका स्वराज इंडियाचे संस्थापक शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी सांगलीत केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशात बदल घडत आहे. या यात्रेला समर्थन द्या, असे आवाहनही त्यांनी केले. सांगलीतील स्टेशन चौकात नफरत छोडो, भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ जनसंवाद यात्रा झाली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीचे प्रा. पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे शंभुराज काटकर, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, नगरसेवक मंगेश चव्हाण, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, फिरोज पठाण उपस्थित होते. प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर समन्वयक ललित बाबर यांनी भारत जोडो यात्रेची माहिती दिली.

यादव म्हणाले की, गेल्या चार ते पाच वर्षांत देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. पण त्याची प्रसारमाध्यमात चर्चा होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातही हे मुद्दे नसतात. दिल्लीतील राज्यकर्ते या मुद्दयांपासून जनतेला भटकविण्यासाठी हिंदू-मुस्लीम करीत असतात. भारत मातेच्या दोन्ही सुपुत्रात भांडणे लावण्याचा उद्योग भाजप करीत आहेत. देशात बलात्कार, खून करणाऱ्यांचा सन्मान होत आहे. संविधान, लोकशाहीची मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या साऱ्याविरोधात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा परिणाम दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आता देशात महागाई, बेरोजगारी दिसू लागली आहे. देशातील सध्याची परिस्थती बदलण्यासाठी जात, धर्म, पक्ष विसरून रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मराठा सेवा संघाचे प्रा. संजय पाटील, ॲड. अजित सूर्यवंशी, ॲड. के. डी. शिंदे, नितीन चव्हाण, करीम मेस्त्री यांच्यासह स्वराज इंडियाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योगपती मित्राची भरभराट

कोरोनामुळे देशातील ९७ टक्के कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या उलट देशातील एका उद्योगपतीची संपत्ती मात्र वाढत गेली. लाॅकडाऊन सुरू झाला तेव्हा त्यांची संपत्ती ६६ हजार कोटी होती. आज ती १२ लाख कोटी इतकी आहे. दोन वर्षांत १८ टक्के वाढ झाली. हे उद्योगपती कोणाचे मित्र आहेत, हे देशाला माहीत असल्याचे सांगत यादव यांनी पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

टॅग्स :SangliसांगलीYogendra Yadavयोगेंद्र यादवNarendra Modiनरेंद्र मोदी