शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दोन वर्षांत सोडविणार, माजी मंत्री जयंत पाटलांनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 4:53 PM

बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचाही त्यांचा उद्देश आहे. अशा काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे

जत : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार सहकाराच्या नियमात आणि घटनेत बदल करत आहे. बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचाही त्यांचा उद्देश आहे. अशा काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे. यासाठी सांगली बाजार समितीत महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी पॅनलकडे एकहाती सत्ता द्या, असे आवाहन करत जतच्या वंचित गावांचा पाणीप्रश्न येत्या दाेन वर्षात सोडवू, अशी ग्वाही माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी साेमवारी दिली.दरिकोणूर (ता. जत) येथे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत, जयश्रीताई पाटील, अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती.जयंत पाटील म्हणाले, सांगली बाजार समितीच्या उमेदवारीबाबत काही लाेक नाराज झाले असले तरी त्यांनी पक्षासाठी आणि भाजपाच्या विचाराला बाजूला सारण्यासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे. जत तालुक्यासाठी आम्ही सर्वात जास्त जागा दिल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी येथे एकदिलाने काम करत आहे. येणाऱ्या काळात जतच्या ६५ गावांना पाणी मिळणार आहे. मी मंत्री असताना सहा टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. पण, दुर्दैवाने सरकार गेल्याने ही योजना पूर्ण झाली नाही.आता सत्ताधारी सरकारने योजनेला मंजुरी दिली आहे, पण कामाला सुरुवात नाही. तरीही येत्या अडीच वर्षात जतच्या शिवारात पाणी आणण्याची जबाबदारी मी व विश्वजित कदम यांनी घेतली आहे. पाणी आल्यानंतर सर्वात जास्त फायदा जतला होणार आहे. यासाठी बाजार समितीही आपल्या ताब्यात असायला हवी.सभेस सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, सरदार पाटील, रमेश पाटील, सुरेश पाटील, आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, सुजयनाना शिंदे, स्वप्नील शिंदे, बसवराज बिराजदार, पिराप्पा माळी, गणी मुल्ला, अमिन शेख, मच्छिंद्र वाघमोडे यांच्यासह संख, जाडर बोबलाद, दरिबडची, मुचंडी या चार जिल्हा परिषद गटातील सोसायटी व ग्रामपंचायत गटाचे मतदार, उमेदवार उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा