शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
4
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
5
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
6
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
7
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
8
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
9
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
10
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
11
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
12
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
13
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
14
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
15
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
16
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
17
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
18
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
19
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
20
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

सांगली जिल्ह्यात शासनाच्या सात विभागांत लाचखोरीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 12:39 PM

साडेपाच वर्षांतील चित्र; ‘घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचाही फायदा’ तत्त्व अमलात

घनशाम नवाथेसांगली : शासनाच्या अनेक विभागांत टेबलाखालून आणि टेबलावरूनही लाच घेतली जाते. परंतु, असेही काही विभाग आहेत तेथे गेल्या साडेपाच वर्षांत लाचखोरीच झाली नाही. सहकार, आरटीओ, जीवन प्राधिकरण, रजिस्ट्रार, अपंग व वित्त महामंडळ, सार्वजनिक बांधकाम आणि कृषी खाते येथे लाचखोरीची तक्रारच नसल्यामुळे आश्चर्यच व्यक्त होत आहे.‘लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार’ हे राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ब्रीदवाक्य आहे. तुमच्या हक्कासाठी लाच का? असा सवाल करत हा विभाग लाचखोरांना पकडून देण्याचे सातत्याने आवाहन करत असतो. शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याला सापळ्यात पकडून देता येते. तसेच लोकसेवकाने बेहिशोबी मालमत्ता गोळा केली असल्यास त्याचे पुरावे देऊनही कारवाई करता येते. लाचखोरीच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक, मोबाइल ॲप, वेबसाइटवर तक्रार नोंदवता येते. तसेच थेट भेटूनही तक्रार करता येते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर लाचेची मागणी केली आहे काय? याची प्रथम पडताळणी केली जाते. पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यास सापळा रचून लाचखोरांना पकडण्याची कारवाई केली जाते. लाचलुचपत विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत महसूल विभागात सर्वाधिक लाचखोरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या खालोखाल पोलिस दल, जिल्हा परिषद आदी विभागांत लाचखोरांवर कारवाई होते.सांगली जिल्ह्यात शासनाच्या वेगवेगळ्या ३१ विभागांची यादी बनवली आहे. यातील सहकार, आरटीओ, जीवन प्राधिकरण, रजिस्ट्रार, अपंग व वित्त महामंडळ, सार्वजनिक बांधकाम आणि कृषी खाते या सात विभागांत २०१९ पासून लाचखोरीची कारवाईच झालेली नाही. ही माहिती वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. परंतु, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात हे चित्र दिसते. सहकार, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम, कृषी खाते, जीवन प्राधिकरण हे महत्त्वाचे विभाग आहेत. येथे नागरिकांचा कामानिमित्त थेट संबंध येतो. परंतु, ‘घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचा फायदा’ या तत्त्वामुळे लाचखोरीची तक्रारच गेल्या साडेपाच वर्षांत तरी झालेली दिसून येत नाही. एकप्रकारे ही आश्चर्याची बाबच म्हणावी लागेल.

येथे तक्रार करा कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास मोबाइल क्रमांक ९८२१८८०७३७ या क्रमांकावर तसेच टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२३३-२३७३०९५ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणGovernmentसरकार