शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

इस्लामपुरात तिसऱ्या पर्यायाची चर्चा

By admin | Published: May 06, 2016 12:23 AM

सत्ताधाऱ्यांकडे गर्दी : नगरपालिका निवडणुकीत प्रभाग रचनेवर प्रश्नचिन्ह

अशोक पाटील --इस्लामपूर --नगरपालिका निवडणूक सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी आरक्षण सोडतीही काढल्या जाणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे, तर विरोधी गटात कलह सुरू आहे. त्यासाठी तिसरा पर्याय असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.इस्लामपूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना काय असेल, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. गत निवडणुकीत तीन प्रभागांचा एक प्रभाग अशा पध्दतीने निवडणुका झाल्या होत्या. मात्र यावेळी लहान प्रभागनिहाय निवडणुका होणार असल्याचे वृत्त आहे. परंतु यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.सध्या पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादी ताकदीने रणांगणात उतरणार आहे, तर विरोधकांत आजही एकमत नाही. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांंंमध्ये विजय पाटील, बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, संजय कोरे, सौ. अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव, मनीषा पाटील, संजय कोरे यांचे प्रभाग अभेद्य आहेत, तर उर्वरित नगरसेवकांना उमेदवारी मिळविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करावे लागणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत उमेदवारी डावललेल्या इच्छुकांनी यावेळी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याची भाषा सुरु केली आहे.उरुण परिसरात राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी, इस्लामपूर शहर विभागात मात्र विरोधकांची ताकद वाढल्याचे चित्र आहे. महाडिक युवा शक्तीच्या ताकदीवर ओसवाल गु्रप, सतीश महाडिक, चेतन शिंदे, जलाल मुल्ला यांच्यासारखे मातब्बर उमेदवार राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकतात, तर व्यापारी वर्गातून एल. एन. शहाही यावेळी ताकदीने निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. विजय कुंभार विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत असले तरी, त्यांना विरोधकांची एकत्रित ताकद मिळत नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांना नगण्य समजत आहेत. प्रभाग रचनेनंतर इस्लामपुरातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष लागले आहे. प्रभाग रचनेविषयी अद्याप कोणतेही आदेश पालिकेकडे उपलब्ध नाहीत. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेविषयी आदेश येण्याची शक्यता आहे.- दीपक झिंजाड, मुख्याधिकारीविरोधकांना घेऊनच सत्ताधाऱ्यांविरोधात शहरातील सुशिक्षित आणि चांगल्या वर्गातील उमेदवार एकत्रित करण्याचा विचार आहे. यात यश आले नाही, तर शहरात तिसरा पर्यायही असू शकेल.- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.