शहरं
Join us  
Trending Stories
1
“चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय”; विखे पाटील भेटीनंतर जरांगेंची फडणवीसांवर टीका
2
प्रवाशांनो लक्ष द्या! ट्रेनमध्ये सामान चोरीला गेले तर रेल्वेची जबाबदारी; बॅगची झाली होती चोरी, आता मिळणार ४.७ लाख रुपये
3
राम कदम ते सुनील राणे...भाजपचे मुंबईत धक्कातंत्र?; ५ आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता
4
निवडणूक आयोगाने सांगूनही महायुतीकडून आचारसंहितेचा भंग; 'त्या' २०० निर्णयांची होणार चौकशी
5
महायुतीला आणखी एक धक्का? हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार? भाजपाला धडा शिकवायचा निर्धार!
6
मोठी बातमी! आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही; 'मविआ'ला ताकद देणार?
7
मला मराठी चित्रपटांची ऑफरच येत नाही! प्रिया बापटचा मोठा खुलासा, म्हणाली- "२०१८ नंतर मी एकही..."
8
टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला; Matt Henry चा 'पंजा' अन् William ORourke चा 'चौका'
9
Varun Dhawan : "...नाहीतर माझी बायको मला घराबाहेर काढेल"; लेकीच्या जन्मानंतर वरुणला नताशाची वाटते भीती?
10
मुंबईत उद्धवसेना मोठा भाऊ, काँग्रेसला दुसरे स्थान; ३६ पैकी ३३ जागांवर एकमत; तिढा कोणत्या जागांचा?
11
लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात मोठी कारवाई! देशभरात छापे, पानिपतमधून शूटरला अटक
12
Bajaj Auto Share Price: शेअर ₹२०००० पर्यंत पोहोचण्याचा होता दावा, पण विक्रमी कमाईनंतरही शेअर जोरदार आपटले
13
समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता
14
Video: अफलातून कॅच! हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल; सर्फराज खान शून्यावर बाद!
15
लाडकी बहीण योजना बंद होणार का? जयंत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही सत्तेत आल्यास....”
16
Ola, Ather अन् TVS... 'या' कंपन्या किती वर्षांची बॅटरी वॉरंटी देतात?
17
वरळीत चुरस वाढणार, भाजपाच्या आघाडीच्या महिला नेत्या आदित्य ठाकरेंविरोधात लढणार?  
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: राजकीय घडामोडींना आला वेग! हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार?
19
७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप?
20
Oriana Power : २१०० रुपयांपार पोहोचला 'या' सोलर कंपनीचा शेअर; ११८ रुपयांवर आलेला IPO, तेजीचं कारण काय?

पूरपट्ट्याबाबत मुख्यमंत्र्यांची भीष्म प्रतिज्ञा हवेमध्ये विरली, वडनेरे समितीच्या शिफारशींचे गाठोडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 3:29 PM

प्रसंगी कठोर भूमिका घेऊन राज्यातील पूरपट्ट्यातील अतिक्रमणे हटविणारच, अशी भीमप्रतिज्ञा मुख्यमंत्र्यांनी सांगली व कोल्हापूर दाैऱ्यात केली होती.

अविनाश कोळीसांगली : प्रसंगी कठोर भूमिका घेऊन राज्यातील पूरपट्ट्यातील अतिक्रमणे हटविणारच, अशी भीमप्रतिज्ञा मुख्यमंत्र्यांनी सांगली व कोल्हापूर दाैऱ्यात केली होती. ती आता हवेत विरली आहे. वडनेरे समितीने दिलेल्या अहवालाचेही गाठोडे बांधण्यात आल्याने सांगली शहरात आपत्ती व्यवस्थापनाची औपचारिकता पार पाडली जात आहे. एकीकडे आपत्ती व्यवस्थापन सुरू असताना दुसरीकडे नदीपात्रालगतच बांधकामे व भराव टाकण्याचे काम सुरू झाले आहे.सांगली जिल्ह्यात महापुराचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊण लाख घरांत शिरलेले पाणी, ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान ही आकडेवारी धडकी भरविणारी आहे. महापूर आल्यानंतर प्रत्येकवेळी मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांचे दौरे होतात. पण, प्रत्यक्षात ठोस उपाययोजना केली जात नाहीत.वडनेरे समितीने मे २०२० मध्ये त्यांचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. त्याची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट संकेत ठाकरे यांनी दिले होते. याशिवाय सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपाहणी दौऱ्यात त्यांनी अतिक्रमणांवर कारवाईची भीमप्रतिज्ञाही बोलून दाखविली होती. त्यांच्या दौऱ्यास आता वर्षे उलटले तरीही राज्यातील पूरपट्ट्यात एकाही अतिक्रमणास हात लावला नाही. याउलट वर्षभरात आणखी शेकडो बांधकामे पूरपट्ट्यात निर्माण झाली.सांगली शहरातील ओत आता पूर्णपणे भरले आहेत. वर्षभरात ही अतिक्रमणे वाढली. याबाबत ना जिल्हा प्रशासनाने काही कारवाई केली ना महापालिकेने. दोन्ही प्रशासनाने हाताची घडी घालत या बांधकामांकडे पाहण्याशिवाय काही केले नाही.

एकीकडे आपत्ती व्यवस्थापन, दुसरीकडे भरावएकीकडे महापालिका, जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक करीत असताना दुसरीकडे नदीपात्रालगत, ओतात, पूरपट्ट्यात भराव टाकण्याचे काम अजूनही सुरु आहे. केवळ पावसाळ्यात ते थांबण्याची शक्यता आहे.वडनेरे समितीच्या शिफारसींवर नजर

  • अतिक्रमणाविरुद्ध ठोस धोरण राबविणे
  • निषिद्ध, प्रतिबंधित क्षेत्रातील अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्यासाठी फ्लड प्लॅन व झोनिंग नियम कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी लागू करणे.
  • एककालिक पूर पूर्वानुमान पद्धतीचा महाराष्ट्रासह संपूर्ण कृष्णा खोऱ्यात अवलंब करणे.
  • नदीपात्र पुनर्स्थापित करणे.
  • नदीपात्रातील काही अतितीव्र वळणे सरळ करणे
  • पूररेषा सुधारित करणे
  • पूरनिवारणासाठी सुयोग्य जागेत साठवण तलाव निर्माण करणे. 

सांगलीतील २०२१ मधील नुकसान

  • पुराचा फटका बसलेली घरे ७३,९९७
  • बाधित शेती ४० हजार हेक्टर
  • पूरबाधित शेतकरी १ लाख ५६५
  • मृत जनावरे १२१
टॅग्स :SangliसांगलीfloodपूरChief Ministerमुख्यमंत्री