शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

पर्यटन दिन विशेष: सांगली जिल्ह्यात पर्यटनाचा बोऱ्या, नागरिकांच्या देश-विदेश वाऱ्या

By अविनाश कोळी | Published: September 27, 2023 4:44 PM

सह्याद्री पर्वतरांगेचा झालेला स्पर्श, जैवविविधतेने समृद्ध असलेले जंगल, हिरवाईने नटलेले डोंगर, बारमाही वाहणाऱ्या नद्या, महापुरुषांच्या स्मारकांचा समृद्ध वारसा जिल्ह्याला लाभला

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबाबत नाके मुरडून स्थानिक नागरिक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर देश-विदेशात फिरायला जात आहेत. कोरोनानंतर पर्यटनाला पसंती देणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यात बाहेरून पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या अत्यंत तुरळक आहे. जिल्ह्यात प्रत्येकवर्षी एका पर्यटनस्थळावर सरासरी केवळ ५ हजार ७४० रुपये खर्च होत आहेत.सह्याद्री पर्वतरांगेचा झालेला स्पर्श, जैवविविधतेने समृद्ध असलेले जंगल, हिरवाईने नटलेले डोंगर, बारमाही वाहणाऱ्या नद्या, नद्यांची संगमस्थळे या माध्यमातून निसर्गाने मुक्तपणे दिलेले दान तसेच साहित्यिक, कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, महापुरुषांच्या स्मारकांचा समृद्ध वारसा जिल्ह्याला लाभला आहे. तरीही पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा विकास करण्याकडे ना राजकीय नेत्यांचे लक्ष आहे ना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर एकूण २ कोटी ८४ लाख रुपये खर्च झाले. प्रती पर्यटनस्थळ हा खर्च केवळ ५ हजार ७४० रुपये आहे.

तालुकानिहाय पर्यटनस्थळेशिराळा ८वाळवा ५पलूस ४कडेगाव ४खानापूर ४आटपाडी २तासगाव ४मिरज १०क. महांकाळ ४जत   ५एकूण - ५०

केवळ ‘क’ दर्जाची पर्यटनस्थळेराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनस्थळांचा अ वर्गात, राज्य स्तरावरील स्थळांचा ब वर्गात, जिल्हा स्तरावरील स्थळांचा क वर्गात तर स्थानिक स्तरावरील पर्यटनस्थळांचा ड वर्गात समावेश होतो. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पर्यटनस्थळे क वर्गात मोडतात.

दरवर्षी ४५०० लोक जातात देश, विदेशातजिल्ह्यातून दरवर्षी सुमारे ४ हजार ५०० लोक देशांतर्गत व परदेशातील पर्यटनास जातात. यातही परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के असल्याचे ट्रॅव्हल्स् कंपनीचालकांनी सांगितले.

जिल्ह्यात पाहण्यासारखे कायचांदोली अभयारण्य, दंडोबा, सागरेश्वर अभयारण्य आदी महत्त्वाची पर्यटनस्थळे असली तरी त्यांच्या विकासाबाबत उदासीनता दिसून येते. जिल्ह्याच्या संकेतस्थळावरही चारही पर्यटनस्थळांचा उल्लेख आहे.

निसर्गाने जिल्ह्याला खूप काही दिले, मात्र पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याचा विकास झाला नाही. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन विकास होतो, मग सांगलीबाबत उदासिनता का?  - प्रदीप सुतार, पर्यटनप्रेमी 

कोरोनानंतर पर्यटनास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. देशांतर्गत पर्यटनस्थळांना भेटी देतानाच परदेशात व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया याठिकाणी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. - मंगेश शहा, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स् व्यावसायिक

टॅग्स :Sangliसांगलीtourismपर्यटन