शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

मतांच्या राजकारणासाठी भारतात जन्माला आलेले गद्दार पाकिस्तानपेक्षाही धोकादायक; पडळकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 09:43 IST

काँग्रेसच्या लोकांना देशाचं देणंघणं नाही, त्यांना फक्त मताचं देणंघेणं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

BJP Gopichand Padalkar: "पाकिस्तानात जेवढे दहशतवादी नाहीत तेवढे मतांच्या राजकारणासाठी भारतात काही गद्दार तयार झाले आहेत. आता आपल्याला पाकिस्तानची चिंता राहिलेली नाही. पाकिस्तानविरोधात सीमेवर आपले जवान लढत आहेत, केंद्र सरकार ताकदीने उभं राहत आहे. आता आपली आर्मी बदलत आहे. पण मतांच्या राजकारणासाठी भारतात जन्माला आलेले गद्दार पाकिस्तानच्या दहशतवाद्यांपेक्षा जास्त घातक आहेत. याची आपण चिंता केली पाहिजे. पाकिस्तानात इसिस आहे, इराण-इराकमध्ये तालिबानी आहेत, तसंच आपल्या देशामधील काँग्रेसीही त्याच विचारांचे लोक आहेत," असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. सांगलीत हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने घुसखोरमुक्त महाराष्ट्र अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या सभेत आमदार पडळकर बोलत होते. 

गोपीचंद पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, "सांगलीत आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये राहायचं असेल तरी आयडी प्रुफ लागतं. मग या देशात राहण्यासाठी तो नागरिक या देशाचा नको का? हजार-पाचशे रुपयांसाठी काही दलाल घुसखोरांना बनावट आधार आणि रेशन कार्ड काढून देत आहेत. पाकिस्तान क्रिकेट मॅच हरल्यानंतर मिरज आणि सांगलीत काही लोक घोषणा देतात. यापुढे आपण असा प्रकार चालून द्यायचा नाही. सांगलीच्या एसपींना माझं सांगणं आहे की, १००-२०० पोलिस घ्या आणि अशा घोषणा देणाऱ्या लोकांचं कबरडं मोडून काढा," असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे.

दरम्यान, "काँग्रेसच्या लोकांना देशाचं देणंघणं नाही, त्यांना फक्त मताचं देणंघेणं आहे. मतांच्या राजकारणासाठी इतिहासाची तोडमोड करायची, मतांच्या राजकारणासाठी नवीन इतिहास लिहायचा आणि जुना इतिहास मान्य नाही, असं सांगून नवीन इतिहासकार जन्माला येत आहेत," अशी टीकाही गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाSangliसांगलीcongressकाँग्रेस