शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

रेल्वेतून तीन वर्षांत दीड हजार मृतदेहांची वाहतूक, सामाजिक बांधिलकीपोटी साडेचार कोटींचे उत्पन्न सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 2:22 PM

एकट्या मुंबईतूनच ९६ टक्के वाहतूक झाली

सदानंद औंधेमिरज (जि. सांगली) : मध्य रेल्वेने गेल्या तीन वर्षांत पार्सल बोगीतून तब्बल १५४० मृतदेहांची वाहतूक केली. त्यासाठी सुमारे ४ कोटी ६२ लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. मुंबई विभागात सर्वाधिक १४८७ मृतदेहांची वाहतूक झाली आहे. मृतदेहासाठी मालवाहतुकीची बोगी रिकामी ठेवावी लागत असल्याने हे नुकसान झाले आहे.देशभरात हजारो किलोमीटर लांब अंतरावर मृतदेह वाहून नेण्यासाठी लांब पल्ल्याची रेल्वे सोयीची ठरते. मुंबईतून बिहार, आसाम, दक्षिण भारत, दिल्ली यासह परराज्यात दूरच्या ठिकाणी रस्त्याने मृतदेह नेणे फारच महाग व वेळखाऊ आहे. अशा वेळी रेल्वे वाहतूक अत्यंत सोयीची, कमी खर्चिक व सुरक्षित ठरते. त्यासाठी मेल, एक्स्प्रेस गाडीच्या पार्सल बोगीचा वापर होतो. गाडीच्या पहिल्या किंवा शेवटच्या पार्सल बोगीत मृतदेह ठेवला जातो.एक्स्प्रेसमध्ये प्रत्येकी चार टन क्षमतेच्या दोन पार्सल बोगी असतात. मृतदेह ठेवलेल्या बोगीत अन्य कोणतेही साहित्य भरले जात नाही. त्यासाठी ३० हजारांच्या महसुलावर पाणी सोडावे लागते. इतके नुकसान सोसल्यानंतरही सामाजिक बांधीलकी म्हणून मृतदेहाची वाहतूक केली जाते. संबंधित मृताचा अंतिम प्रवास त्याच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत व्हावा यासाठी पार्थिव त्याच्या प्रदेशात पोहोचवले जाते.मृतदेह वाहतुकीचे शुल्कही अत्यल्प ठेवण्यात आले आहे. मुंबईतून उत्तर व दक्षिण भारतात लांब पल्ल्यावर मृतदेह नेण्यासाठी फक्त एक ते दीड हजार रुपये आकारण्यात येतात. कोरोना काळात २०२० पासूनच्या गेल्या तीन वर्षांत १५४० मृतदेहांची वाहतूक झाली. त्यासाठी तितक्याच बोगी फक्त मृतदेहासह म्हणजे रिकाम्याच धावल्या. त्यामुळे ४ कोटी ६२ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.

तीन वर्षांतील विभागनिहाय मृतदेह वाहतूक

  • मुंबई १,४८७
  • भुसावळ ४७
  • नागपूर २
  • पुणे ४
  • एकूण १,५४० 

मुंबईतून परप्रांतीय मजुरांच्या मृतदेहांची वाहतूकमुंबईत परप्रांतीय मजुरांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे तेथून सर्वाधिक मृतदेहांची वाहतूक होते. तीन वर्षांत एकट्या मुंबईतूनच ९६ टक्के वाहतूक झाली आहे. सोलापूर विभागात एकाही मृतदेहाची वाहतूक झालेली नाही.

बर्फाच्या पेटीतून वाहतूकरेल्वेतून मृतदेह वाहतुकीसाठी नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते बर्फाच्या पेटीत ठेवूनच रेल्वेकडे सोपवावे लागते. रेल्वेकडे विनंती केल्यानंतर एका दिवसात पार्सल बोगी उपलब्ध करून देण्यात येते.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे