शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

तासगावच्या रक्तदात्यांना ‘हिमालया’चा सलाम, राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:37 PM

डोंगर कितीही विशाल असला तरी समाजकार्यातून घडलेल्या माणुसकीची विशालता त्यासमोर कमीच भासते. म्हणूनच तासगाव तालुक्यातील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनने गेल्या काही वर्षात देश-विदेशातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवून उभारलेल्या समाजकार्याच्या डोंगराला चक्क हिमालयाने सलाम केला आहे. हिमालयन सेव्हिवर्स या संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्काराने या ग्रुपला गौरविण्यात आले.

ठळक मुद्देतासगावच्या रक्तदात्यांना ‘हिमालया’चा सलामबॉम्बे ओ ग्रुपच्या चळवळीचे कौतुक

सांगली : डोंगर कितीही विशाल असला तरी समाजकार्यातून घडलेल्या माणुसकीची विशालता त्यासमोर कमीच भासते. म्हणूनच तासगाव तालुक्यातील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनने गेल्या काही वर्षात देश-विदेशातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवून उभारलेल्या समाजकार्याच्या डोंगराला चक्क हिमालयाने सलाम केला आहे. हिमालयन सेव्हिवर्स या संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्काराने या ग्रुपला गौरविण्यात आले.हिमालयाच्या पर्वतरांगांना कवेत घेतलेल्या हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. हिमालयन सेव्हिवर्स या संस्थेमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतात रक्तदानाशी निगडीत काम करणाऱ्या मोजक्याच पन्नास संस्थांना सोबत घेऊन ही संस्था कार्यरत आहे.

या संस्थेने यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार तासगावच्या बॉम्बे ओ ब्लड ग्रुपचा प्रदान केला. दुर्मिळ रक्तगट असूनही देशभरात अशा रक्तदात्यांचे जाळे तासगावच्या या ग्रुपने विणले. विक्रम यादव यांच्या पुढाकाराने उभारलेल्या संस्थेने गेल्या काही वर्षात देशातील, परदेशातील रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचे कार्य सुरू आहे. या कार्याची दखल घेत हिमालयन सेव्हिवर्स संस्थेने शहीद दिनाच्या निमित्ताने तासगावच्या या ग्रुपचा सन्मान केला.अध्यक्ष विक्रम विश्रांत यादव, महेश चौगुले, विनोद धोतरे, स्विटी मोरे,स्वप्निल कुंभार, निखिल हारोले, अवधुत जाधव, रश्मी मखमल्ला,रूपाली कुरणे,रोहीत कदम,यांनी स्वीकारला कांगडाचे उपजिल्हाधिकारी ललित पाल, भारतीय कबड्डी संघाचे कर्णधार अजय टाकुर आदी यावेळी उपस्थित होते.

हिमालयन सेव्हिवर्सचे अध्यक्ष हरीष म्हणाले की, रक्तदानासारखे दुसणे पुण्यकार्य कोणते नाही. रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. ते फक्त मानवी शरिरात तयार होते. त्या रक्ताला कोणत्या जातीपातीचे बंधन नाही.तासगावच्या संस्थेच्या कार्याने आमची मने जिंकली. देशभरात त्यांनी उभारलेले कार्य हे खुप मोठे आहे.विक्रम यादव म्हणाले की, आम्ही संस्थेच्या माध्यमातुन संपुर्ण देशभर मोफत रक्त पुरवठा करतो. त्यासाठी देशातील अन्य रक्तदानाचे काम करणाऱ्या संस्थांचेही सहकार्य मिळते. त्या सर्व संस्थांचाही हा सन्मान आहे. अत्यंत गरीब रूग्णांना दीड लाखापर्यंतची आर्थिक मदतही आम्ही करीत असतो. आमच्या संस्थेला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्या सर्व रक्तदात्यांना समर्पित करीत आहे, जे रक्ताची गरज पडल्यावर विनामोबदला व निस्वार्थीपणे रक्तदान करतात त्यासाठी वेळ देतात.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीSangliसांगली