शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

दोन ‘जलदूत’ आज लातूरला धावणार

By admin | Published: April 18, 2016 11:58 PM

जलवाहिनीचे काम पूर्ण : आठवी पाणी एक्स्प्रेस लातूरला रवाना

मिरज : मिरजेतून सोमवारी सायंकाळी दहा टॅँकरची आठवी ‘जलदूत’ एक्स्प्रेस लातूरला रवाना झाली. लातूरला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था पूर्ण झाल्याने मंगळवारी दहा व पंचवीस टॅँकरच्या दोन जल एक्स्प्रेस साडेसतरा लाख लिटर पाणी घेऊन लातूरकडे धावणार आहेत. दरम्यान, लातूरसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेची जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पाहणी केली. मिरजेतून दहा टॅँकरची आठवी जल एक्स्प्रेस सायंकाळी ५.४० वाजता रवाना झाली. आतापर्यंत लातूरकरांसाठी ४० लाख लिटर पाणी जल एक्स्प्रेसने पोहोचविले आहे. सोमवारी दुपारी आणखी दहा टॅँकरमध्ये पाणी भरण्यास सुरुवात करण्यात आली. ही जल एक्स्प्रेस मंगळवारी रवाना होणार आहे. मिरजेतील जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंतच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याचा थेट हैदरखान विहिरीत साठा करण्यात येणार असल्याने विहिरीतील पाणी ३५ अश्वशक्ती पंपाद्वारे उपसा करण्यात आले. सोमवारी रात्री थेट नदीतून उपसा केलेले पाणी हैदरखान विहिरीत सोडून २५ अश्वशक्ती पंपाद्वारे २५ टॅँकरमध्ये वितरिकेने भरण्याचे काम सुरू झाले. मंगळवारी दहा व पंचवीस टॅँकरच्या दोन जल एक्स्प्रेस अंदाजे १७ लाख ५०० लिटर पाणी घेऊन लातूरला पाणी पुरवठ्यासाठी धावणार आहेत. (वार्ताहर)हैदरखान विहिरीत पाण्याचे झरे!नदीतील पाण्याचा साठा करण्यासाठी हैदरखान विहिरीतील पाण्याचा उपसा करून तो ओढ्यात सोडण्यात येणार आहे. संपूर्ण पाण्याचा उपसा झाल्यानंतर विहिरीच्या चोहोबाजूंच्या झऱ्यातून पाणी वाहत होते. विहिरीतील शिल्लक पाण्याच्या नमुन्याचीही तपासणी केल्यानंतर नदीचे पाणी विहिरीत सोडण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीलातूरला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी नदीतून पाणी उपशासाठी पूर्ण करण्यात आलेल्या व्यवस्थेची जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पाहणी केली. जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता एस. एल. गरंडे, महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे, तहसीलदार किशोर घाडगे, ठेकेदार शशांक जाधव, रेल्वे अधिकारी जॉर्ज उपस्थित होते. लातूरसाठी आतापर्यंत रेल्वेच्या ८ खेपांद्वारे ४० लाख लिटर पाणी देण्यात आले आहे. २५ टॅँकरद्वारे लातूरला पाणी देण्याची व्यवस्था पूर्ण झाल्याचेही जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.