शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता

By admin | Published: April 22, 2016 11:05 PM

बी. जी. कोळसे-पाटील : आंबेडकर जयंतीनिमित्त कास्ट्राईब संघटनेकडून जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

सांगली : जगातील कष्टकरी जनतेच्या उध्दारासाठी कार्य करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडला होता. देशाचा अन्नदाता असलेल्या जनतेचे शोषण करुन आपला उध्दार साधणाऱ्या प्रवृत्तीचे आता राज्य आल्याने, कष्टकरी जनतेच्या पिळवणुकीत वाढच होत असून आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता निर्माण झाल्याचे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी शुक्रवारी केले. जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात जिल्हा परिषद प्रशासन, बार्टी, पुणे आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘कामगार संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शोषणातून मुक्तता हा राज्यघटनेचा उद्देश फक्त आणि फक्त आंबेडकरांच्यामुळे सफल झाला आहे. जगातील कोणत्याच राज्यघटनेत याचा उल्लेख नसल्याने जगभरातील शोषितांच्या उध्दारासाठी त्यांनी कार्य केले. मात्र, सध्या आरएसएसमुक्त भारताची घोषणा करत असताना देशातील अस्वस्थ परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. आरएसएसने आपल्या विषारी विचारसरणीचा खुबीने वापर केल्याने देशात विचारांची लढाई करण्याची वेळ आहे. आरएसएसच्या या विचारसरणीला प्रत्युत्तर देण्यासाठी आंबेडकरांचे विचार उपयोगी पडणार आहेत.त्यांनी पुढे सांगितले की, देशातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था अधिक प्रबळ करण्यासाठी नेहमीच गोळवलकर, टिळक आणि सावरकरांचे विषारी विचारच कारणीभूत ठरले आहेत. इतिहासाकडे चिकित्सक पध्दतीने पाहिल्यास, वास्तवावर आधारित इतिहासाचे पुनर्लेखन करणे आवश्यक बनले आहे. समाजात निर्माण झालेल्या दु:खाचे मूळ विषारी विचारसरणीत असल्याने या विचारसरणीला झिडकारले पाहिजे. आंबेडकरांचे विचार समाजात रुजविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करायला हवेत, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रघुनाथ भोसले, डॉ. बाबूराव गुरव, गणेश मडावी, बाजीराव प्रज्ञावंत, विजय सातपुते, मनोज बनकर, संतोष कदम, नरेंद्र खांडेकर, विकास देवके, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंबेडकर समजूच दिले नाहीतदेशातीलच नव्हे, तर जगभरातील कष्टकरी मानवजातीच्या कल्याणासाठी आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी ठरते. मात्र, भांडवलदारांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या लोकांना आंबेडकरांचे हे महान कार्य कळतच नाही, त्यांना कळूही दिले जात नाही, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले.