शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

सांगली, मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्षबागांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:20 PM

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली

सांगली : जिल्ह्यात गुरुवारी रात्री सांगली, मिरज शहरास कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा निर्यातक्षम द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.द्राक्षबागांच्या छाटणीवेळीही अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्नातून द्राक्षबागा वाचविल्या आहेत. तोपर्यंत गुरुवारी रात्री साडेसात वाजल्यानंतर जवळपास अर्धातास सांगली, मिरज शहरांसह कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतात पाणी साचल्याने ऊसतोडी रखडल्या आहेत, तर ऐन फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांच्या हंगामालाही फटका बसणार आहे.जिल्ह्यातील पूर्व भागासह काढणीला आलेले आणि फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज शहरात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली.कवठेमहांकाळला अर्धा तास हजेरीशिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी, कोंगणोळी, करोली टी, शिंदेवाडी, म्हैसाळ एम. परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दुपारपासून कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांमध्ये यामुळे भीती निर्माण झाली आहे

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी