शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

'वंदे भारत'चा सांगलीला ठेंगा अन् उत्पन्नात कमी असलेल्या साताऱ्याला थांबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 1:21 PM

सांगलीतील प्रवाशांतून नाराजी : १७ डिसेंबर रोजी पंतप्रधानांकडून उद्घाटन

सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, या गाडीला पुण्याखालोखाल सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगली स्थानकात थांबा न देता उत्पन्नात सर्वांत कमी असलेल्या सातारा स्थानकावर थांबा दिला आहे. त्यामुळे सांगलीतील सामाजिक संघटना, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.सध्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सुरू असलेल्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये कोल्हापूरपाठोपाठ सांगली रेल्वे स्थानकावरून सर्वाधिक तिकिटांचे बुकिंग होत असते. कराड व किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक दुसऱ्या क्रमांकावरचे उत्पन्न देत आहे व सातारा हे सर्वांत कमी उत्पन्न देत आहे. तरीही मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगली व किर्लोस्करवाडी या दोन सर्वाधिक उत्तम उत्पन्न देणाऱ्या रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा दिला नाही.पाच हजार कोटी खर्च करून पुणे-सांगली-लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले. जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सांगलीसारख्या प्रमुख महानगराला जलद रेल्वे गाड्यांचा संपर्क मिळावा. सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पुणे-लोंढा दुपदरीकरण रेल्वे प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. तरीही याच सांगली जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय असलेल्या सांगली रेल्वे स्टेशनवरून वंदे भारत सेमी बुलेट ट्रेन सुसाट निघून जाणार आहे.

नेत्यांवर नाराजीएखाद्या प्रमुख शहराला रेल्वे गाडीचा थांबा मिळला नाही, तर संबंधित शहरातील लोकप्रतिनिधी रेल्वे मंत्रालयाकडे धाव घेतात व त्या गाडीला थांबा मिळवून देतात. मात्र, सांगलीच्या बाबतीत राजकीय उदासीनता दिसून येते, असे मत नागरिक जागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

सांगली जिल्ह्याचे खासदार व स्थानिक आमदारांनी हा थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व नागरिकांनी सांगली व किर्लोस्करवाडी या दोन रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा मिळवून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाबरोबर संघर्षाची तयारी ठेवावी. लोकप्रतिनिधींनी जर याप्रश्नी लक्ष दिले नाही, तर सांगलीकर म्हणून आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीत याचा हिशेब करू. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस