शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वारणा पाणी योजना २५० कोटींची; समडोळीतून पाणी उचलून सांगली, कुपवाडला पुरवठा

By शीतल पाटील | Updated: June 29, 2023 13:35 IST

कृष्णा नदीचे वाढलेले प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची टंचाई यावर उपाय म्हणून वारणा पाणी योजना

शीतल पाटीलसांगली : कृष्णा नदीचे वाढलेले प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची टंचाई यावर उपाय म्हणून वारणा नदीतून सांगली व कुपवाडला पाणी देण्याची योजना आखली जात आहे. या योजनेचा आराखडा महिन्याभरात तयार होणार आहे. त्यासाठी २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.माजी मंत्री मदन पाटील यांच्या सत्ताकाळात केंद्र शासनाने युआयडीएसएसएमटीअंतर्गत सांगली व कुपवाड या दोन शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बळकटीसाठी ७९.०२ कोटींच्या योजनेला मंजुरी दिली. पण पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली अन् मदन पाटील यांची सत्ताही गेली. त्यामुळे योजनेचे काम रखडले. नव्याने सत्तेवर आलेल्या विकास महाआघाडीने योजनेची कामे हाती घेतली.वारणा उद्भव वगळून शहरातील वितरण व्यवस्था बळकटीकरणावर त्यांनी भर दिला. पहिल्या टप्प्यातील निधीतून जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने कुपवाड झोनमधील कापसे वसाहत, शामनगर, गव्हर्नमेंट कॉलनी, वान्लेसवाडी व वाघमोडेनगर येथे पाण्याची टाकी, जॅकवेल ते माळबंगल्यापर्यंतची दाबनलिका, १०२ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था आदी कामे मार्च २०१४ पर्यंत पूर्ण करण्यात आली.

वास्तविक कृष्णा नदी कोरडी पडू लागल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता. त्यासाठी वारणा योजना हाती घेण्यात आली. पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वारणेतून पाणी न उचलता नवीन टाकी बांधणे, जलवाहिन्या टाकण्याचे काम केले. अमेरिकन तंत्रज्ञानावर आधारित जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. त्यानंतर काही वर्षे कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले नव्हते. पण यंदा उन्हाळ्यात पुन्हा शहराला पाण्याची टंचाई भासली. काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा वारणा योजनेची गरज भासू लागली आहे.

पाणी माळबंगला केंद्रापर्यंत आणणार

  • मदनभाऊ युवा मंचाकडून सातत्याने वारणा योजनेबाबत पाठपुरावा सुरू होता. अखेर महासभेतही योजना राबविण्याबाबतचा ठराव झाला. आता खासगी कंपनीकडून वारणा योजनेचा आराखडा तयार केला जात आहे.
  • सांगलीवाडी-समडोळी हद्दीत जॅकवेलसाठी जागाही घेण्यात येत आहे. वारणा नदीतून पाणी उचलून ते माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाणार आहे.
  • त्याशिवाय शामरावनगरसह तीन ते चार ठिकाणी नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे नियोजन आहे.
  • २५० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. योजनेचा आराखडा अंतिम झाल्यानंतर निधीसाठी तो शासनाकडे सादर केला जाणार आहे.
टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी