शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

प्रश्न मांडण्यात विक्रमसिंह सावंत अव्वल, जयंत पाटील दुसऱ्या क्रमांकावर; भाजप आमदारांची उदासीनता

By अविनाश कोळी | Published: October 04, 2024 10:47 AM

सातारा, कोल्हापूरपेक्षा सांगलीचा आवाज मोठा

अविनाश कोळी

सांगली : राज्याच्या २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत झालेल्या १२ अधिवेशनांमधील प्रश्नांचा अभ्यास एका संस्थेने केला असून जिल्हानिहाय आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला आहे. यात काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी सर्वाधिक प्रश्न मांडले असून भाजप आमदारांनी सर्वात कमी प्रश्न मांडले आहेत.मुंबईतील संपर्क संस्थेने अधिवेशनांमधील प्रश्नांचा अभ्यास अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. यात अधिवेशनातील आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. विषयनिहाय प्रश्नांचा अभ्यासही यात मांडला आहे. सांगली जिल्ह्यातील आमदारांनी आरोग्य व शेतीसंदर्भातील प्रश्न सर्वाधिक मांडले. याशिवाय सांगली, कोल्हापूर व सातारा या तिन्ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रश्न सांगली जिल्ह्यातील आमदारांनी मांडल्याचेही दिसून येते.

कोणत्या आमदारांनी किती प्रश्न मांडले

आमदार पक्ष             प्रश्नसंख्याअनिल बाबर शिवसेना             ६७

जयंत पाटील राष्ट्रवादी (श. प.)             २०४मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी (श. प.) २२

सुमन पाटील राष्ट्रवादी (श. प.) १२६सुरेश खाडे भाजप             १

विक्रमसिंह सावंत काँग्रेस २१४विश्वजीत कदम काँग्रेस १४१

सुधीर गाडगीळ भाजप             ० 

जिल्हानिहाय प्रश्नांची टक्केवारी

सांगली ९.०९

कोल्हापूर ७.८९सातारा ६.०१

जिल्ह्यातील आमदारांनी कोणते प्रश्न मांडले

विषय प्रश्नबालक १७

महिला, मुली १९शालेय शिक्षण ३८

आरोग्य ४८अंगणवाडी ९

पोषण            १आदिवासी १३

पाणी            २९पर्यावरण १३

शेती             १६सिंचन             ९

रेशन             ६वीज            १४

मनुष्यबळ २६प्रश्न विचारण्यात काँग्रेस अव्वल

पक्षनिहाय अभ्यास केला तर काँग्रेसच्या दोन आमदारांनी मिळून एकूण ३५५, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी मिळून ३५२, शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी ६७ तर भाजपच्या दोन आमदारांनी मिळून एक प्रश्न विचारला आहे.

राज्यातील प्रश्न अधिक

जिल्ह्यातील आमदारांनी विचारलेल्या एकूण प्रश्नांपैकी ८९ टक्के प्रश्न हे राज्याचे होते. जिल्ह्यातील समस्यांविषयी एकूण ५९ प्रश्न विचारले गेले. म्हणजेच जिल्ह्यातील केवळ ११ टक्के प्रश्न उपस्थित केले गेले. 

जिल्ह्यातील या प्रश्नांवर टाकला प्रकाशझोतअवकाळी, अतिवृष्टी व गारपीटने झालेले शेतीचे नुकसान

बोगस फायनान्स कंपन्यांकडून फसवणूक,सांगली, मिरजेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर

जत तालुक्यातील वंचित ६४ गावांच्या पाण्याचा प्रश्नअलमट्टीमुळे सांगलीला महापुराचा फटका

दत्त इंडिया साखर कारखान्याकडून नदीचे प्रदूषणबागेवडी (ता. जत) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचार

कोयना धरणातून सांगली जिल्ह्याचे हक्काचे २७.५० टीएमसी पाणी मिळावे

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभा