शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

वसंतदादा कारखान्याचे पाणी बंद

By admin | Published: February 11, 2016 12:15 AM

राखेप्रश्नी कारवाई : कारखान्याकडून प्रतिज्ञापत्र; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीनंतर बुधवारी कारखान्याचे पाणी कनेक्शन पाटबंधारे विभागाने तोडले. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड यांच्या पथकाने कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. कारखान्याकडूनही प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या जात असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. सांगली जिल्हा सुधार समितीने वसंतदादा कारखान्याच्या राखेप्रश्नी लढा उभा केला होता. सुधार समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजाविली होती. तसेच हरित न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी चालविली होती. त्याची चाहूल लागताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वसंतदादा कारखाना २४ तासांत बंद करण्याची नोटीस काढली. ही नोटीस काल मंगळवारी बजाविण्यात आली. तसेच कारखान्याचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्यासाठी वीज महावितरण व पाटबंधारे विभागाला सूचना केली होती. त्यानुसार बुधवारी पाटबंधारे विभागाने कारखान्याचे पाणी कनेक्शन तोडले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड, क्षेत्र अधिकारी बी. व्ही, मालवेकर, यु. जे. माने यांच्या पथकाने वसंतदादा कारखान्याला भेट देऊन प्रदूषणाची पाहणी केली. कारखान्याने आठ बॉयलरपैकी सहा बॉयलर सुरू ठेवले आहे. ज्या दोन बॉयलरमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा नाही, ते बंद ठेवले आहेत. तीन बॉयलर जर्मनमेड असल्याने त्यातून प्रदूषण होत नाही. बॉयलर क्रमांक सात ते आठमधील यंत्रणा बंद होती. ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बॉयलरमधून बाहेर पडणाऱ्या राखेचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. तसा अहवाल प्रदूषण अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे. या अहवालावरील निर्णयाची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यातच वसंतदादा कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. यात ऊस गाळप हंगामात कारखाना बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कारखाना बंद ठेवणे हा त्यावरील उपाय नाही. प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठीची यंत्रसामग्री खरेदी केली जात आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत कारखान्यातून राख बाहेर पडणार नाही, अशी योजना करीत आहोत, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)वसंतदादा कारखान्याकडून प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. येत्या मार्चपर्यंत आम्ही सर्व यंत्रणा अद्ययावत करीत आहोत. कारखाना बंद पाडणे हा त्यावरचा पर्याय होऊ शकत नाही. कारखाना बंद झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांचा ऊस तुटून फडात पडला आहे. तो कारखान्यावर आणून गाळप करावा लागेल. आम्ही जिल्हा सुधार समितीच्या कार्यकर्त्यांशी प्रदूषणाबाबत चर्चा करणार आहोत. यातून निश्चितच चांगला मार्ग निघेल. - विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा कारखानाहरित न्यायालयात जाणार : अमित शिंदेवसंतदादा कारखाना २४ तासात बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजाविली आहे. या नोटिशीत बॉयलरमध्ये राख प्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे म्हटले आहे. बुधवारी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर राखेचे प्रमाण कमी झाल्याचा अहवाल दिला आहे. यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका दुटप्पी आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कारखाना बंद झाला नाही, तर जिल्हा सुधार समितीच्यावतीने हरित न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिला.