शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कर्नाटककडे पाणी रवाना

By admin | Published: April 25, 2016 11:24 PM

सहा दिवस पाण्याचे नियोजन : पाटबंधारे विभागाची यंत्रणा सज्ज

सांगली : कमी पर्जन्यमानामुळे कर्नाटकात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकला एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारपासून राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता पाणी मोजून सोडण्यास सुरुवात झाल्याचे व पुढील सहा दिवसात पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी सांगितले. शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यापासून कर्नाटकातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे कर्नाटकातील अनेक भागात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक सरकारने कृष्णा नदीतून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, धरणात असलेल्या कमी पाणीसाठ्यामुळे वारणा (चांदोली) व कोयना धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या पाण्याचे नियोजन करण्यासाठी दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली होती. यात दोन दिवसात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार होते. या एक टीएमसी पाण्यासाठी कोयनेतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळपासून कर्नाटकला पाणी सोडण्याची कार्यवाही सुरु झाली. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातील नारायणपूर योजनेतून एक टीएमसी पाणी अक्कलकोटसाठी सोडण्यात येणार आहे. कर्नाटकातून मात्र, अजूनही अक्कलकोटसाठी पाणी सोडण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी) अक्कलकोटला पाणी नाहीचदोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्यातील पाटबंधारे प्रशासनाने यंत्रणा कामी लावत, दिलेल्या शब्दाप्रमाणे सोमवारपासून कर्नाटकला पाणी देण्यास सुरुवात केली. कर्नाटकातून अक्कलकोटला मिळणाऱ्या पाण्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत माहिती घेतली असता, अक्कलकोटला पाणी देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.अधिकाऱ्यांच्या बैठकीतील निर्णयानुसार कर्नाटकला पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दर तासाला मोजणी करण्यात येणार असून पुढील सहा दिवसात एक टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी त्याठिकाणी थांबून असल्याने पाणी सोडण्यात अडचण येणार नाही.- हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग