शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

रेठरे धरणामध्ये आज 'वाकुर्डे'चे पाणी, चाळीस वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 1:13 PM

१९९८ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्णयानुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेमुळे कऱ्हाड, शिराळा व वाळवा तालुक्यांना फायदा होणार आहे.

मानाजी धुमाळरेठरे धरण : गेली चाळीस वर्षे शेतीच्या पाण्याची वाट पाहत बसलेल्या रेठरे (ता. वाळवा) येथील शेतकऱ्यांच्या शेतात आता वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे येणार आहे. या पाण्याचे पूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या उपस्थितीत रेठरे धरण तलावात होणार आहे.

१९९८ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्णयानुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेमुळे कऱ्हाड, शिराळा व वाळवा तालुक्यांना फायदा होणार आहे. चांदोली धरणातून डाव्या कालव्यामधून हे पाणी खिरवडे येथे उचलून ते हात्तेगाव येथून वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलावात सोडले आहे. तेथून हे पाणी मानकरवाडी तलावातून सायफन पद्धतीने बंदिस्त पाईपलाईनद्वारे रेड-शिराळा व रेठरे धरण, मरळनाथपूर, धुमाळवाडी, वाघवाडी परिसरात मिळणार आहे.

योजनेवर २६० कोटी रुपये खर्च

आतापर्यंत या योजनेवर २६० कोटी रुपये खर्च झाले आहेत. दुसरा फाटा रेड येथून ढगेवाडी, कापरी, जक्राईचीवाडी, शिवपुरी, लाडेगाव व इटकरे परिसरात जाणार आहे. मानकरवाडीपासून पूर्वेला चौदा किलोमीटर अंतरावर बंदिस्त पाच फूट व्यासाच्या पाईपमधून योजनेचे पाणी रेड व रेठरे धरण तलावात टाकण्यात येणार आहे. यामुळे रेठरे धरण परिसरातील ५ हजार एकर शेती पाण्याखाली येणार आहे.

५३५ मीटर लांबीचा व ५० फूट बोगदा खोदून पाणी आणले जाणार

रेड ते रेठरे धरणदरम्यान उंच भाग व खडक असल्याने पाणी उताराने वाहून येण्यासाठी रेठरे धरण येथे सुमारे ५३५ मीटर लांबीचा व ५० फूट बोगदा खोदून पाणी आणले जाणार आहे. यंदा प्रथमच शिराळाच्या पूर्वेस असणारे वाळवा तालुक्यातील या योजनेत समाविष्ट असणारे सर्व तलाव भरून घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीFarmerशेतकरी