शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

भाजपकडून पाण्याचे राजकारण

By admin | Published: January 24, 2017 12:53 AM

जयंत पाटील : २१ फेब्रुवारीनंतर पाणी योजना बंद होणार

सांगली : शेतकरी पाण्यासाठी आक्रोश करीत होते, तेव्हा राज्य सरकारला पाणी योजना सुरू करण्याची इच्छा झाली नाही. निवडणुका जाहीर होताच त्यांनी योजना सुरू केल्या. २१ फेब्रुवारीनंतर त्या बंदही होतील. भाजप पाण्याचा उपयोग केवळ मतांसाठीच करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी नेते आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, पाणी योजना सुरू करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आक्रोश करीत होते. त्यावेळी थकीत बिलाचे कारण सांगून योजना सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी सरकारला लोकांची कणव आली नाही. आता निवडणुकांमुळे मतांवर डोळा ठेवून योजना सुरू केल्या आहेत. लोक या सर्व गोष्टी जाणून आहेत. निवडणुका संपल्यावर पुन्हा योजनांचे पाणी बंद होणार असल्याने लोक भाजपच्या या खेळीला भुलणार नाहीत. निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्प जाहीर केला जाऊ नये, असे वाटत असले तरी, आता याबाबत न्यायालयाचा निर्णय झालेला आहे. न्यायालयीन निर्णयाचा आम्ही आदर करतो. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोठमोठ्या घोषणा केल्या जाणार, याची कल्पना आम्हाला आहे. आजवर भाजपने याच गोष्टींचे भांडवल केले आहे. घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याची बाब आता लोकांच्याही लक्षात आलेली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबद्दल ते म्हणाले की, तालुकास्तरावरील पदाधिकारी व नेत्यांना आम्ही काहीप्रमाणात निर्णय घेण्याचे व चर्चा करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आघाडी करायची की नाही, कोणाबरोबर करायची, याबाबतचे निर्णय तालुकास्तरावरच घेतले जातील. जिल्हास्तरावर अंतिम चर्चा होणार असली तरी, तालुक्यातील नेत्यांचा निर्णय महत्त्वाचा असेल. राष्ट्रवादीतील लोक भाजपमध्ये येत असल्याबद्दलचा गाजावाजा काही नेतेमंडळी करीत आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. राष्ट्रवादीच्या मुलाखतींच्या कार्यक्रमाला झालेली गर्दीच सर्व काही स्पष्ट करीत आहे. जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, अशी माझी इच्छा होती. अजूनही काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)