शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

लाँचिंग प्रतीकचं, टायमिंग जयंतरावांचं; मंत्री जयंत पाटलांची मुलासाठी विधानसभेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 4:24 PM

विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ मुलासाठी सोडला, तर खुद्द जयंतराव शेजारच्या सांगलीतून उतरतील, असं बोललं जातंय. दुसरीकडं त्यांनी थेट लोकसभाच लढवावी, असाही मतप्रवाह पुढं येऊ लागलाय.

श्रीनिवास नागे

राजकारणात वेळेत केलेलं ‘लाँचिंग’ पुढचा राजमार्ग प्रशस्त करते, असं म्हणतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आता चिरंजीव प्रतीक यांच्या राजकारणातील प्रवेशाची तयारी सुरू केलीय. विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ मुलासाठी सोडला, तर खुद्द जयंतराव शेजारच्या सांगलीतून उतरतील, असं बोललं जातंय. दुसरीकडं त्यांनी थेट लोकसभाच लढवावी, असाही मतप्रवाह पुढं येऊ लागलाय.

गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रतीक पाटील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसताहेत. स्वत:चा उद्योग सांभाळत ते मतदारसंघात फिरताहेत. वडिलांच्या माघारी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात त्यांची हजेरी ठरलेलीच. त्यांच्याकडं राज्य व्हॉलिबॉल संघटनेचं अध्यक्षपदही देण्यात आलंय. पहिल्यांदा राजारामबापू साखर कारखान्याचं अध्यक्षपद देऊन नंतर त्यांना राजकारणात उतरवलं जाईल, असं मध्यंतरी सांगितलं जात होतं. नंतर सांगली लोकसभा मतदारसंघात फिरवून जयंतरावांनी गटाची चाचपणी केली होती.

यादरम्यान राजकीय समीकरणं बदलायला लागली. दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हे जयंतरावांचे पक्षांतर्गत स्पर्धक. आता आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित यांचा धडाकेबाज प्रवेश झालाय. कवठेमहांकाळ नगरपंचायत एकहाती ताब्यात घेताना पक्षातील आणि बाहेरील विरोधकांना चारीमुंड्या चित केल्याचं चित्र निर्माण करण्यात त्यांचे सल्लागार यशस्वी ठरलेत. त्या प्रचारावेळीच रोहित यांनी, ‘पंचविशीचा होईन, तेव्हा विरोधक संपलेले असतील,’ अशी टाळ्या वसूल गर्जना केली होती. ते आता २३ वर्षांचे आहेत, तर प्रतीक २८ वर्षांचे! रोहित २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवतीलच, असं दिसतंय. ते जिंकून विधानसभेत गेले तर त्यांची ‘सिनिअॅरिटी’ प्रतीक यांच्यासाठी भविष्यातील अडथळा ठरेल. त्यामुळे ‘उतरवलं तर आताच,’ अशी खूणगाठ बांधत जयंतरावांनी मुलासाठी तयारी सुरू केल्याचं सांगितलं जातंय.

ती वेळ आणि ही वेळ

राजारामबापूंचं निधन झालं, तेव्हा जयंतराव २४ वर्षांचे होते. आधी त्यांनी पाच-सहा वर्षे साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळली आणि नंतर विधानसभेत गेले. आता त्यांनी जिल्हाभर स्वत:चा गट निर्माण केलाय. प्रतीक यांच्यासाठी इस्लामपूर हाच सुरक्षित मतदारसंघ आहे. दांडगा लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचा मजबूत गट, सहकारी संस्थांचं जाळं या जोरावर आणि विरोधक कधीच एकत्र येत नसल्यानं जयंतरावांनी सातवेळा मैदान मारलंय. आता ते साठीत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील वजनदार मंत्री आहेत. राज्यात पक्षाची हवा आहे आणि विरोधक विखुरलेत. त्यामुळं मुलाच्या राजकीय ‘लाँचिंग’साठी यासारखी योग्य वेळ ती कोणती! हे ‘टायमिंग’ साधायचं जयंतराव सोडतील का?

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस