शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

जलसंपदाने दबावाखाली न येता उपसाबंदी कायम ठेवावी- महापूर नियंत्रण समिती

By संतोष भिसे | Published: June 25, 2023 7:58 PM

कोयनेत ३० दिवसांचाच साठा, पाऊस लांबल्यास चूळ भरायलाही पाणी मिळणार नाही

सांगली: कृष्णा नदीतील उपसाबंदी उठवल्याने कोयना धरणातील पाणीसाठा महिनाभरच पुरणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने सर्व दबाव झुगारुन उपसाबंदीवर ठाम रहावे असे आवाहन कृष्णा नदी महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केले आहे.

समितीतर्फे विजयकुमार दिवाण यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उपसा सुरुच राहिल्यास संकट उद्भवेल. पाऊस लांबल्यास चूळ भरायलाही पाणी मिळणार नाही. दरम्यान, धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरलेला असताना जलसंपदा विभाग मात्र उपसाबंदीविषयी धरसोड करत आहे. २३ ते २६ जूनपर्यंत उपसाबंदी आदेश जारी केला होता. तो मागे घेताना रविवारपासून (दि. २५) उपशाला परवानगी देण्यात आली. सर्व योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी सांगली व साताऱ्याच्या महावितरणला कळविण्यात आले.

यावर समितीने आक्षेप घेतला आहे. दिवाण यांनी सांगितले की, कोयनेत सध्या ५.५६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दररोज २१०० क्युसेक क्षमतेने उपशामुळे महिन्याभरात सुमारे ६३००० क्युसेक पाणी धरणातून नदीत येईल. म्हणजे ५.५० टीएमसी पाण्याचा उपसा होईल. आगामी ३० दिवस कसेबसे पाणी पुरेल. त्यानंतर मात्र धरणात खडखडाट निर्माण होणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस लांबला, किंवा कमी प्रमाणात झाला, तर सांगली, साताऱ्यात हाहाकार उडेल.

आठवडाभर उपसाबंदी लागू करासमितीने म्हटले आहे की, सर्व उपसा सिंचन योजना आठवडाभर बंद ठेवाव्यात. त्यानंतर पाऊस व धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उपसाबंदीबाबत पुढील निर्णय घ्यावा. जलसंपदा विभागाने कोणत्याही दबावाखाली न येता निर्णय घ्यावेत. नियोजन करावे. सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाला अद्याप सुरुवात झालेला नाही याचा गांभीर्याने विचार करावा.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरण