शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

'जलसंपदा, महापालिकेच्या निष्क्रियतेमुळेच सांगलीत पाणी टंचाई'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 6:43 PM

प्रदूषण अधिकारी गप्प का ?

सांगली : कोयना धरणात सध्या ६७ टीएमसी पाणीसाठा असतानाही केवळ जलसंपदा आणि महापालिका प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळे सांगली शहरातील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट आले आहे, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या या निष्क्रियतेबद्दल त्यांना जाब विचारण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील आणि सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले की, पाणी नसल्यामुळे कृष्णा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. नदीचे सध्याचे पात्र हे केवळ महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीही समन्वय नसल्यामुळेच कोरडे पडले आहे. कोयना धरणात सध्या पाणीसाठा ६७ टीएमसी आहे. जवळपास ६१ टक्के पाणीसाठा आहे. वारणेमध्ये २६ टीएमसी पाणी आहे. असे असताना सांगलीकरांना मात्र आता आठ दिवस दूषित पाणी प्यावे लागत आहे.

कऱ्हाड ते सांगलीपर्यंत गटारी, कारखाना मळी, औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे दूषित पाणी थेट नदीत मिसळत आहे. हेच दूषित पाणी सांगलीकरांना प्यावे लागत आहे. यामुळे अनेक आजाराचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याला महापालिका अधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा फटका जनतेला बसत आहे. या सर्वांचा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्याची गरज आहे. तरीही लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे.

कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सांगलीच्या दूषित पाण्याबाबत तक्रार केली आहे. कृष्णा नदीतील पाण्याबाबत कोयना धरणातील अधिकाऱ्यांशी जलसंपदा आणि महापालिका अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवला पाहिजे, अशी मागणीही केली आहे. यावेळी बैठकीला विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, संजय कोरे, सतीश रांजणे, आदी उपस्थित होते.प्रदूषण अधिकारी गप्प का ?कृष्णा आणि वारणा नद्यांच्या दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना यापूर्वी कृष्णा नदीच्या दूषित पाणी आणि मृत माशाबद्दल जाब विचारला होता. तरीही त्यांच्याकडून दूषित पाण्यास जबाबदार कारखाने आणि महापालिकेवर कारवाई होत नाही, असा आरोपही कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी