शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Sangli news: म्हैसाळ सिंचन प्रकल्पाचा पाणीउपसा थांबवला, शेतकरी चिंतेत

By संतोष भिसे | Updated: July 3, 2023 14:12 IST

पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात

सांगली : म्हैसाळ प्रकल्पातून गेले पाच महिने सुरु असलेला पाणीउपसा अखेर थांबविण्यात आला. कोयना धरणात आणि कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने पंप बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.गेल्या महिन्याभरापासून कृष्णेत पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे. सध्या पाणी आले असले, तरी ते पिण्यापुरतेच आहे. त्यामुळे सिंचनासाठीच्या उपशावर पाटबंधारे विभागाने काहीवेळा निर्बंध लादले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठपुराव्यानंतर उपसाबंदी उठवण्यात आली, पण नदीत पाणीच नसल्याने म्हैसाळ प्रकल्पाचे पंप बंद करावे लागले. कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या मिरज, कवठेमहांकाळ किंवा तासगाव तालुक्यातून पाण्याची मागणी नव्हती. जतमध्ये पाणीपुरवठा सुरु होता, पण नदीत पाणी नसल्याने उपशावर मर्यादा येत होत्या. पहिल्या तीन पंपगृहांमध्ये दोन किंवा तीनच पंप सुरु ठेवता येत होते. जतला पाणी देण्यासाठी पहिल्या दोन पंपगृहांत १५ ते १८ पंप सुरु ठेवणे आवश्यक ठरते. पण नदीत पाणी नसल्याने पंपांची संख्या वाढवता आली नाही. परिणाम चार दिवसांपूर्वी उपसा पूर्णत: बंद करण्यात आला.सध्या प्रकल्पाचा मुख्य कालवा कोरडा पडला आहे. या चारही तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. तलाव, ओढे-नाले कोरडेच आहेत. या स्थितीत प्रकल्पाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना आधार मिळत होता.

पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात२० जानेवारीरोजी उपसा सुरु केला होता. तब्बल पाच महिने आवर्तन सुरु राहिले. आता जानेवारीमध्ये पुढील आवर्तन सुरु होण्याची शक्यता आहे. पण धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यास पुराचे संकट टाळण्यासाठी ऐन पावसाळ्यात उपसा पुन्हा सुरु केला जाऊ शकतो. हे पाणी दुष्काळी पट्ट्याला पुरवले जाईल.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी