शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मिरजेत तांबट व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:00 AM

सदानंद औंधे । लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : एकेकाळी शेकडो कारागीर असलेल्या मिरजेत आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच तांब्या, पितळेची ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : एकेकाळी शेकडो कारागीर असलेल्या मिरजेत आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच तांब्या, पितळेची भांडी घडविणारे तांबट या नावाने ओळखले जाणारे कारागीर शिल्लक राहिले आहेत. महागाईमुळे स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर वाढल्याने तांबट बेरोजगार झाले आहेत. तांबा-पितळेच्या भांड्यांची क्रेझ पुन्हा वाढत असताना तांबट व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे.मिरजेत कमानवेस परिसरात तांबट मंडळींचा भांडी ठोकण्याचा आवाज सर्वांनाचा परिचयाचा होता. तांबा, पितळ व अ‍ॅल्युमिनियमची भांडी हाताने ठोकून कारागीर घडवित असत. ऐरणीवर पातेले, घागर, हंडा यासह मोठ्या आकाराची भांडी ठोकून चमकविण्यात येतात. भांड्यावर घणाचे, हातोडीचे घाव घालून भांडे घडविण्याचे काम खरोखर कष्टाचे आहे. कारखान्यातून तयार केलेली भांडी घडविण्यासाठी कारागीरांकडे येतात.तांबा व पितळ हे धातू स्वस्त असताना मिरजेतील कारागीरांचा व्यवसाय जोमात होता; मात्र गेल्या दशकात तांबा व पितळेची किंमत वाढल्याने पातेले, घागर, हंडा अशा भांड्यांची मागणी कमी झाली. स्टील व प्लास्टिकच्या स्वस्त भांड्यांचा वापर वाढल्याने तांबट कारागीरांच्या व्यवसायावर संक्रांत आली आहे.तांबा व पितळ या धातूची किंमत प्रतिकिलो सहाशे रुपयांवर गेली आहे. यामुळे दोन हजार ते दहा हजार रुपये किमतीची तांबा, पितळेची भांडी परवडत नसल्याने, स्टीलच्या स्वस्त भांड्यांचा, अ‍ॅल्युमिनिअमच्या मोठ्या भांड्यांचा वापर होत आहे. गरीब कुटुंबांमध्ये प्लास्टिक घागरींचा वापर होतो. त्यामुळे काम अत्यल्प उरल्याने तांबट कारागीरांचा व्यवसाय संपला आहे. मिरजेतील कमानवेस परिसरात आता केवळ चारच कारागीर शिल्लक आहेत. तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई करणारा तर मिरजेत एकच कारागीर आहे.बेरोजगार झालेले अनेक कारागीर औद्योगिक वसाहतीत कामाला जात आहेत. कारागीरांची मुलेही परंपरागत व्यवसायाऐवजी अन्य व्यवसाय करीत आहेत. सुमारे ३० ते ४० वर्षे तांबट काम करणारे कारागीर आजही हलाकीत जगत आहेत. तांबट कारागीरांना शासनाकडून मदतीची अपेक्षा कारागीर फिरोज बैरागदार व महंमदहनिफ पठाण यांनी व्यक्त केली.तक्रारीमुळेही अडचणी!चहाच्या दुकानात पितळेच्या भांड्यांचा वापर सुरू झाल्याने पुन्हा तांबा-पितळेच्या भांड्यांची क्रेझ निर्माण होत आहे. मात्र तांबा, पितळेची भांडी घडविणारे कारखाने व कारागीर मोठ्याप्रमाणात असलेल्या कर्नाटकातील नसलापूर या गावातून भांडी तयार होऊ लागल्याने स्थानिक कारागीरांच्या हाताला काम उरलेले नाही. भांडी ठोकण्याच्या आवाजाबद्दल होणाऱ्या तक्रारींमुळेही हा व्यवसाय अडचणीत आला आहे.