शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही, आम्ही लढा देणार'; जयंत पाटलांनी थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:04 IST

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडक्या बहिणींसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली.

Jayant Patil ( Marathi News ) : राज्यात काही महिन्यापूर्वीच 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांना १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत महिलांच्या खात्यावर सात हप्ते जमा झाले आहे. दरम्यान,आता या योजनेत बदल करुन नवीन नियम आणल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची बातमी समोर आली. यावरुन आता राजकीय वरर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'आम्ही लाडक्या बहीणींचे पैसे बंद होऊ देणार नाही, त्यांची पाठीशी उभे राहून लढा देणार' असल्याची घोषणा केली आहे. 

"फडणवीस-अजितदादांची जवळीक, एकनाथ शिंदेंसोबत दुरावा; २ महिन्यात मोठे बदल होणार"

काल सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, एकदा पैसे दिले की दिले. लोकांनी यावर मतही दिली आहेत. आधीच नियम बघून द्यायला हवे होते. आता न बघता दिल्यावर थांबवता येणार नाहीत. आता महिलांचे पैसे थांबवता येणार नाहीत, आता आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने आहोत. तुमचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी आमचा लढा कायम चालू राहिल. तुम्ही आता काहीच चिंता करु नका, अशी घोषणाच आमदार जयंत पाटील यांनी केली. 

 ५ लाख लाभार्थ्यांना वगळले

काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली होती. त्यांनी नव्या निकषाबाबत माहिती दिली. या नव्या निकषांनुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत. जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात दिले जात होते. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.

आपल्या पोस्टमध्ये तटकरेंनी लिहिले की, २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.

अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस