शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

विहिरी, तलाव कोरडे ठणठणीत

By admin | Published: February 24, 2016 12:45 AM

दुष्काळाची चाहूल : कवठेमहांकाळ तालुक्यातील स्थिती

जालिंदर शिंदे ल्ल घाटनांद्रेकवठेमहांकाळ तालुक्यातील लघुप्रकल्प तलावातील पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झाली असून अकरापैकी केवळ पाच तलावात मृतसंचय पाणीसाठा असून, एक तलाव कोरडा, तर उर्वरित पाच तलावांमध्ये केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चालू उन्हाळा तीव्र होण्याची शक्यता असून आतापासूनच तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.यावर्षाच्या अवर्षणाने तालुक्यातील विहिरी, बंधारे, ओढे, नाले कोरडे पडले असून कूपनलिकांनी तळ गाठला आहे. तलावात उपलब्ध असणारा पाणीसाठाही हळूहळू कमी होत चालला आहे. तालुक्यातील तीन तलावांमधील पाणीसाठा केवळ महिनाभर पुरेल इतकाच राहिला आहे. तसेच केवळ दोन तलावातीलच पाणी टिकून आहे. त्यामुळे चालू उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचीही परिस्थिती गंभीर बनणार आहे, असे चित्र आहे. तालुक्यातील अकरा तलावांपैकी लांडगेवाडी, लंगरपेठ, हरोली, दुधेभावी, घोरपडी या पाच तलावांमध्ये मृतसंचय पाणीसाठा आहे. बोरगाव तलाव कोरडा आहे, तर उर्वरित पाच तलावात कुची (३ टक्के), रायवाडी (३१ टक्के), नांगोळे (१८ टक्के), बंडगरवाडी (२३ टक्के), मध्यम प्रकल्प (बसाप्पावाडी - ५० टक्केपेक्षा कमी) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन चालू झाल्याने तालुक्यातील काही भागास लाभ होईल. परंतु तालुक्यातील बऱ्याचअंशी भाग अद्याप जलसिंचन योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे चालू उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पुढील तीन महिन्यांचा कालावधी कसा जाणार, तसेच शेती, पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचे काय होणार?, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरु आहे. काही भागात कोणत्याही जलसिंचन योजनांचा लाभ न मिळाल्याने तेथेही द्राक्ष व डाळिंब पिकाचे क्षेत्र मोठे आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीतही कमालीची घट झाली असून पावसाविना नैसर्गिकरित्या निर्माण होणारा चारा निर्माण न झाल्याने जनावरांचेही चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी चारा छावणी किंवा चारा डेपो सुरु करण्याची मागणी करु लागला आहे. शेतीतील उभे पीक जतन करण्यासाठी कूपनलिका खोदून नशीब अजमावण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकंदरीत दुष्काळाची छाया गडद बनली आहे. रब्बीबरोबर खरीपही वाया गेल्याने, तसेच चारा व पाणीसाठा नसल्याने त्याचा मोठा परिणाम दुग्ध व्यवसायावरही झाला आहे.