शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

विशाल पाटील यांचा संबंधच काय?

By admin | Published: February 04, 2017 12:04 AM

पतंगराव कदम; तो महान नेता, मी लहान आहे!

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मिरज वगळता इतर सर्व तालुक्यातील उमेदवारांची निश्चिती झाली आहे. उमेदवारांची नावे शेवटच्या दिवशीच जाहीर होतील. मिरज तालुक्याचा निर्णय प्रतीक पाटील व जयश्रीताई पाटील एकमताने घेतील. यात विशाल पाटील यांचा संबंधच काय? तो महान नेता आहे, मी लहान आहे, अशा शब्दात शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकार बैठकीत टोला लगावला.मिरज तालुक्यात वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष, काँग्रेसचे नेते विशाल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करीत असल्याबद्दल विचारले असता डॉ. कदम म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसला जिल्ह्यात वातावरण चांगले आहे. काँग्रेसची स्वबळावर सत्ता येईल. मिरज वगळता सर्व तालुक्यांतील उमेदवारांची यादी एकमताने तयार झाली आहे. मिरजेबाबत प्रतीक पाटील व जयश्रीताई पाटील निर्णय घेणार आहेत. त्यांनी नावे अंतिम करून माझ्याकडे द्यायची आहेत. यात विशाल पाटील याचा संबंध येतोच कुठे? त्यामुळे तो कोणाशी चर्चा करतो, यावर मी कसे भाष्य करणार? गतवेळी मदन पाटील यांनी उमेदवारांची यादी दिली. तीच अंतिम करण्यात आली. मदन पाटील यांनी त्या उमेदवारांना निवडूनही आणले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.भाजप-शिवसेना सोडून इतर पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. खानापुरातील एक जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. शिराळ्यातील दोन जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला आहे. जतमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला एक जागा दिली जाईल. बाकीच्या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसची यादी तयार असली तरी, सहा फेब्रुवारीपर्यंत हा घोळ सुरूच राहील. माघारीच्या दिवशीच खरे चित्र स्पष्ट होईल, असेही कदम यांनी सांगितले. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यावर कदम म्हणाले की, भाजपची ही घोषणा आम्ही दररोजच ऐकतो. देशातील प्रत्येक खेड्यात काँग्रेस रूजली आहे. तिला संपविणे इतके सोपे नाही. सत्ता येते आणि जाते, पण पक्ष संपत नाही. आगामी उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभेच्या निवडणुका देशाच्या राजकारणासाठी ‘टर्निंग पॉर्इंट’ ठरतील.कडेगाव-पलूसमध्ये फरक पडणार नाहीपलूस-कडेगावमध्ये भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. गेल्या तीस वर्षांपासून मी हे बघत आलो आहे. मला आता त्याची सवय झाली आहे. या आघाडीचा काँग्रेसवर काहीही फरक पडणार नाही. नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्व मंत्री प्रचाराला आणले. अगदी शंभर कोटीचे पॅकेज देतो म्हणाले. पलूसमध्ये निकाल काय, तर राष्ट्रवादी शून्य, भाजप एक! राष्ट्रवादीने भाजप-सेना सोडून आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपशी आघाडी करणाऱ्यांना एबी फॉर्मही देणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले होते. आता तेच काय तो निर्णय घेतील. विधानपरिषदेवेळी मोहनराव कदम यांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. काय घडले, ते सर्वांनीच बघितले आहे, असेही कदम म्हणाले.