शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

आचारसंहितेने अतिवृष्टीची मदत मिळणार कधी?; सांगली जिल्ह्यातील ११०२६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 1:00 PM

२७५९१ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

सांगली : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ११ हजार २६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण, जिल्ह्यातील २७ हजार ५९१ शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळाली नाही. हे सर्व शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. ऑक्टोबरमध्येही मुसळधार पाऊस सुरूच असून ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहत आहेत. जुलै महिन्यातील अतिवृष्टी, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.मिरज, शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांमध्ये भाजीपाला, पपई, सोयाबीन, भुईमूग, भात, हळद, मका, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मिरज, शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांतील १६ हजार ९९९ शेतकऱ्यांचे सहा हजार १५९.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी १० कोटी ९० लाख रुपयांच्या निधीची राज्य शासनाकडे मागणी केली आहे. पण, शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

पुन्हा ४१३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसानऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील आठ हजार ५४४ शेतकऱ्यांचे चार हजार १३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये फळपिक, ऊस, सोयाबीन, भुईमुग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वीचीच मदत मिळाली नसताना पुन्हा कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ही मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार, असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीCode of conductआचारसंहिताfundsनिधी