शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

ऊस दर: सांगलीचे साखर कारखानदार तोडगा कधी काढणार?, निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 5:04 PM

माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सर्व कारखानदारांची बैठक बोलविली

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ज्या कारखान्याची एफआरपी तीन हजारपेक्षा जास्त आहे त्यांनी प्रति टन १०० रुपये द्यावेत आणि उर्वरित कारखान्यांनी प्रति टन ५० रुपये जादा शेतकऱ्यांना द्यावेत, असा तोडगा निघाला आहे. या तोडग्याची जिल्ह्यातील कारखानदार अंमलबजावणी करणार की वेगळा काय निर्णय होणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये मिळावेत. तसेच चालू गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला प्रति टन तीन हजार ५०० रुपये दर मिळाला पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन चालू केले होते. या आंदोलनानंतरही कारखानदारांनी दराची कोंडी फोडली नसल्यामुळे गुरुवारी पुणे ते बेंगलोर महामार्गावर कोल्हापुरातील शिरोळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते.या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत ज्या कारखान्यांनी प्रति टन तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिला आहे. त्या कारखान्यांनी प्रति टन १०० रुपये द्यावेत. तसेच उर्वरित कारखानदारांनी प्रति टन ५० रुपये द्यावेत, असा तोडगा निघाला आहे. या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील कारखानदार तोडगा काढणार की नाही, असा शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे.कारखानदारांनी तोडगा काढला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कारखानदारांच्या भूमिकेकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.

२६ नोव्हेंबरला बैठकसांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी दि. २६ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सर्व कारखानदारांची बैठक बोलविली आहे. या बैठकीस शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलविले आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. या बैठकीत तोडगा निघणार की त्यापूर्वीच कारखानदार दराची कोंडी फोडणार, अशीही शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखाने