शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

कुठे घ्यावे उपचार? ‘खासगी’ची दारे बंद!; विमा योजना : २०० कोटी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 8:14 AM

धोकादायक इमारती, असुविधा, सेवेतील दिरंगाई अशा अनेक कारणांनी राज्य कामगार विमा रुग्णालयांकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या कमी होत आहे.

- अविनाश कोळीलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : केंद्र व राज्य शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेच्या (ई.एस.आय.) अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. गेल्या दीड वर्षापासून ही योजना चालविणाऱ्या महाराष्ट्रातील १३३ रुग्णालयांचा परतावा शासनाने दिला नसल्याने खासगी रुग्णालयांनी आता या योजनेतील उपचाराबाबत असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे कामगारांसाठी मोठा आधार बनलेल्या खासगी रुग्णालयांचे दार कामगारांसाठी बंद होत आहे.

 धोकादायक इमारती, असुविधा, सेवेतील दिरंगाई अशा अनेक कारणांनी राज्य कामगार विमा रुग्णालयांकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या कमी होत आहे. राज्यातील १३३ खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा ही योजना सुरू आहे. कामगारांना खासगी रुग्णालयेच बरी वाटतात. मात्र, दीड वर्षापासून शासनाने त्यांचा परतावाच दिला नाही. खासगी रुग्णालयांचे सुमारे २०० कोटी रुपये महामंडळाकडे अडकले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व सेवा ऑनलाइन झाल्या असताना कामगार विमा योजना आजही ऑफलाइन पद्धतीने चालविली जाते. 

दरवर्षी जमा होतात १३०० कोटी रुपयेराज्य कामगार विमा योजनेंतर्गत राज्यातून दरवर्षी सुमारे १ हजार ३०० कोटी रुपये जमा होतात. मालक व कामगार यांचा यासाठी संयुक्त हिस्सा जातो. राज्यभरात १४ कामगार विमा रुग्णालये व त्याठिकाणी तीन हजार खाटा राखीव आहेत. सद्य:स्थितीत २४ लाखांवर कामगारांची नोंदणी आहे.

बंदचे लागले फलक मिरजेतील एका मोठ्या रुग्णालयाने कामगार विमा योजना येत्या १८ ऑक्टोबरपासून बंद करणार असल्याचा फलक लावला आहे.

दोन रुग्णालयांचाच सात कोटी परतावा शासनाकडे अडकला. नाईलाने कामगार विमा योजनेची सेवा बंद करीत आहोत.    - डॉ. रविकांत पाटील, मिरज

ज्या रुग्णालयांचे पैसे थकीत आहेत त्यांनी आमच्याकडे यादी द्यावी. आम्ही ई.एस.आय.सी.कडून ते पैसे मागवून घेऊ. कामगारांसाठीची सेवा रुग्णालयांनी बंद करू नये.    - सुरेश खाडे, कामगारमंत्री