शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

गेल्या ७० वर्षात मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्याचे नाव सांगा, मनोज जरांगे-पाटील यांचे सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 2:27 PM

विट्यातील विराट सभेत सरकारला इशारा

दिलीप मोहिते

विटा : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज आज एकवटला आहे. त्यामुळे सरकार आता पुरावे शोधू लागले आहे. गेली ७० वर्षे ओबीसी नेत्यांचा सरकारवर प्रभाव होता. परंतु, आता सरकारला मराठ्यांचे पुरावे सापडू लागले आहेत. मराठ्यांना आरक्षण न देता त्यांना दाबून मारण्याचा कोणी प्रयत्न केला? गेल्या ७० वर्षापासून मराठ्यांचे वाटोळे कोणी केले, त्याचे नाव आता आम्हाला कळायला पाहिजे, असे आव्हान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिले. यावेळी त्यांनी राजकारणातील भाऊसाहेब, भैय्यासाहेब यांच्या मागे न लागता लेकरांना अभ्यासाकडे वळवावे, असा सल्ला मराठ्यांना दिला.मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांची सांगली जिल्ह्यातील विटा येथे पहिली सभा शुक्रवारी सकाळी झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाज एकवटला होता. शहरात अक्षरश: भगवे वादळ आले होते. जरांगे-पाटील यांचे सकाळी १०.३० वाजता सभास्थळी आगमन झाले. त्यावेळी धनगर समाजाच्यावतीने मराठा आरक्षणाला पाठींबा देत जरांगे-पाटील यांचा घोंगडे व घुंगराची काठी देऊन सत्कार करण्यात आला.मनोज जरांगे-पाटील म्हणाले, ज्या जातीने आरक्षण समजून घेतले त्यांना लगेच आरक्षण मिळाले. पण मराठ्यांनी आरक्षण समजून घ्यायला वेळ लावला. पण वेळाने का होईना मराठा समाज एकत्रीत आला आहे. त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर सरकारला यापुढील काळ जड जाईल. परंतु, आता आरक्षणाची ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे.गेली ७० वर्षे ओबीसींच्या नेत्यांचा सरकारवर प्रचंड प्रभाव होता. त्यावेळी आमचे पुरावे त्यांनी स्वत:च्या बुडाखाली लपवून ठेवले आणि प्रत्येकवेळी पुरावे नसल्याचे सांगत मराठ्यांना आरक्षण देता येत नसल्याचा कांगावा केला. पण आता घरा-घरातील मराठे एकवटले आहेत. सरकारनेही पुरावे शोधायला सुरूवात केली असून लाखो पुरावे मिळाले आहेत.त्यामुळे सरकारला आमचा प्रश्न आहे की, १८२२ पासून १९६७ पर्यंत आणि १९६७ पासून २०२३ पर्यंत जे काही पुरावे सापडले आहेत. त्याच्या आधारावर तुम्ही गेल्या ७० वर्षापूर्वीच आरक्षण दिले असते तर आज मराठ्यांची जगात प्रगत जात झाली असती. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का, याचे उत्तर सरकारकडे नाही. मराठा समाजाने सर्व निकष पूर्ण करूनही त्यांना आरक्षण का नाही?मराठा नेत्यांबाबत बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले, गेल्या ७० वर्षात सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना आमच्या बापजाद्यांनी मोठे केले. आज लेकरांसाठी या नेत्यांच्या मदतीची गरज असताना एकही नेता बोलायला तयार नाही. परंतु, या नेत्यांशिवाय मराठा समाजाने आज ७० टक्के लढाई जिंकली आहे. आनंदाचा क्षण आता जवळ आला आहे. दि. २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. लेकरासाठी लढा आहे.आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही. मतभेद आणि एकजूट तूटू देऊ नका, मराठ्यांच्या त्सुनामी विरोधात जायचे कोणीही धाडस करणार नाही. विजय आपलाच आहे. जो आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याला सोडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.या सभेसाठी विटा शहरात सकाळपासून गर्दी होण्यास सुरूवात झाली होती. सभेसाठी येणाºया लोकांसाठी शहरात ठिकठिकाणी बिस्कीट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मराठा समाज कृती समितीचे समन्वयक शंकर मोहिते, विनोद पाटील, दहावीर शितोळे, शशिकांत शिंदे, अजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी नेटके नियोजन केले होते. डॉ. जितेश कदम, सुहास बाबर यांच्यासह लाखो संख्येने मराठा समाजाने हजेरी लावली होती.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील