शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

सोशल मीडियाच्या अतिरेकातूनच उमदीत खून, भरकटलेल्या तरुणांना आवरणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 6:03 PM

मोबाइलच्या वापराबरोबर सोशल मीडियात तरुणाई गुरफटली. यातून सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेतून वादही उफाळू लागला. यात भरीस भर म्हणून शहराप्रमाणे गुंडगिरी, टोळीयुद्धासारखे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे

गजानन पाटीलसंख : शहराबरोबरच ग्रामीण भागातही गुंडांच्या टोळ्यांना राजकीय पाठबळ, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, गावातील जयंती, उत्सव, कार्यक्रमात मानापमान यामुळे आजची तरुणाई भरकटल्याचे जत तालुक्यातील उमदी येथील दुहेरी खुनाने दाखवून दिले आहे. यात दोन उमद्या तरुणांना जीव गमवावा लागला.

जत पूर्व भागातील उमदी हे राजकीय व सामाजिक दृष्टीने संवेदनशील गाव आहे. ग्रामीण भागातील सर्वांत मोठे गाव आहे. येथे पोलीस ठाणेही आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादनात हे गाव अग्रेसर आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बेदाण्याची निर्मिती केली जाते.

गावातून अहमदनगर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे आर्थिक व सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. लोकांच्या हातात पैसे आले आणि चंगळवादी संस्कृती वाढली. मोबाइलच्या वापराबरोबर सोशल मीडियात तरुणाई गुरफटली. यातून सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेतून वादही उफाळू लागला. यात भरीस भर म्हणून शहराप्रमाणे गुंडगिरी, टोळीयुद्धासारखे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून खुनासारख्या घटना घडू लागल्या. उमदीत मंगळवारी घडलेली घटना ही याचेच उदाहरण आहे.

मृत संतोष राजकुमार माळी हा हुशार विद्यार्थी होता. उदगीर येथे बीएस्सी ॲग्रीच्या तिसऱ्या वर्षात तो शिक्षण घेत होता. गुणवत्तेवर त्याने प्रवेश मिळविला होता. स्पर्धा परीक्षेचीही तयारी करीत होता. त्याची आई बसस्थानकावर हॉटेल चालविते, तर मदगोंडा बगली हा एकुलता एक मुलगा. आई भाजीपाला विक्री करते.

शांततेसाठी प्रयत्न व्हावेत

गावामध्ये वादविवाद, भांडणतंटे सामंजस्याने मिटवून गावपुढाऱ्यांनी शांतता राखण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. राजकारण न करता एकोपा राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया