शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘काँग्रेसयुक्त भाजप’मध्ये कोण कोणाचा पैरा फेडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:39 IST

श्रीनिवास नागे एकीकडं गटबाजी आणि लाथाळ्या, तर दुसरीकडं पक्ष सोडून चाललेले नेते आणि पराभूत मानसिकता यामुळं जिल्ह्यातली काँग्रेस-राष्टÑवादी पक्षांची ...

श्रीनिवास नागेएकीकडं गटबाजी आणि लाथाळ्या, तर दुसरीकडं पक्ष सोडून चाललेले नेते आणि पराभूत मानसिकता यामुळं जिल्ह्यातली काँग्रेस-राष्टÑवादी पक्षांची आघाडी आणखी गटांगळ्या खातेय. सोमवारी शिराळ्याच्या सत्यजित देशमुखांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपचं कमळ हातात घेतलं.अलीकडं राजकारणात ध्रुवीकरणाची संकल्पना खोलवर रूजत असताना सत्तेच्या पटावरची भाजपची पकड घट्ट होत चाललीय. खरं तर सांगली जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वीच राजकीय समीकरणं बदलली. काँग्रेस-राष्टÑवादीच्या बड्या नेत्यांनी भाजपच्या तंबूची वाट धरली. पाच वर्षांत ही वाट बहुपदरी राजमार्ग बनली. महत्त्वाच्या सत्ताकेंद्रांमध्ये कमळ फुललं. गटबाजीनं पोखरलेल्या आणि लाथाळ्यांनी जर्जर झालेल्या काँग्रेस-राष्टÑवादी पक्षांच्या पदरी मग सततचा पराभव येणारच होता. तसंच झालं. पण दोन्ही पक्षांनी गटबाजीचा हेका सोडला नाही! शिराळ्यातले दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित यांच्यासारखे चेहरे लठ्ठालठ्ठीच्या झळांनी जास्त पोळले गेले.तिथले आमदार, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यात १९९५ पासून दुरावा आला. त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडून नाईक यांनी अपक्ष म्हणून झेंडा लावला आणि भाजप-सेना युतीला जवळ केलं. राज्यमंत्री झाले. पाच-सहा वर्षांनी राष्टÑवादीची वाट धरली. तिथं शेजारच्या वाळवा तालुक्यातल्या जयंतराव पाटील यांच्याशी बिनसल्यानं काँग्रेसमध्ये परतले... पुन्हा देशमुख गटाशी हातघाई सुरू झाली. त्यावेळी सत्यजित देशमुखांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले होते. त्यातच राष्टÑवादीत मानसिंगराव नाईक यांच्या रूपानं पुढं आलेल्या तिसऱ्या गटाला जयंतरावांनी पद्धतशीर रसद पुरवली. काँग्रेस-राष्टÑवादीतले हे तिन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यातले दोघे एकत्र आले की, तिसºयाचा पराभव ठरलेला, हे समीकरण आतापर्यंत चालत आलेलं...जिल्ह्यात आधीच काँग्रेस-राष्टÑवादीची भांडणं, त्यात काँग्रेसमधल्या वसंतदादा आणि कदम गटाचा संघर्ष टोकदार बनलेला. त्यामुळं शिराळ्याचा प्रश्न लटकला. मुत्सद्दी शिवाजीराव नाईकांनी पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाऊन तिकीट घेतलं. तिन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आणि नाईक आमदार झाले...तिन्ही गट तोडीस तोड, पण संस्थात्मक पातळीवर मानसिंगरावांची बाजू जरा उजवी. त्यांच्याकडच्या सहकारी आणि खासगी संस्थांचा पसारा मोठा. त्या सगळ्या सक्षम, आर्थिकदृष्ट्या भक्कम. त्या पाठबळावर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा उचल खाल्लीय. मात्र शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांच्याकडं तुलनेनं संस्था कमी. देशमुखांचा साखर कारखाना चालवण्यास दिलेला, तर आमदार नाईकांच्या संस्था अडचणीत आल्यात. देशमुखांकडं शिक्षण संस्थेचं बळ मात्र दिसतंय.विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येताच तिन्ही गटांच्या हालचाली वाढल्या. निवडणुकीच्या राजकारणात तिन्ही गटांची एकमेकांना कधी-ना-कधी मदत झालेली. त्यामुळं आता कुणी कुणाचा पैरा फेडायचा, कुणी थांबायचं याचा घोळ वाढतच चाललेला.काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी असली तरी आणि जयंतराव पाटील हे सत्यजित देशमुखांचे साडू असले तरी त्यांचा ओढा मानसिंगरावांकडंच जादा. काँग्रेसला दाबण्याची संधी ते कशी दवडतील! ते मानसिंगरावांचंच नाव पुढं करणार, हे सूर्यप्रकाशाइतकं लख्ख होतं.दुसरीकडं जिल्ह्यातल्या काँग्रेसला खमक्या नेताच नसल्यामुळं सगळे नेते केवळ आपापले गट शाबूत ठेवण्यात मग्न आणि कार्यकर्ते सैरभैर. त्यामुळं पक्षनिष्ठेच्या कचकडी दुनियेत किती काळ रहायचं, असा सवाल सत्यजित देशमुखांना पडला. याचवेळी ‘इनकमिंग मास्टर’ असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ते हेरलं आणि गळ टाकला. उमेदवारीची भाकरी फिरवण्याचीही चर्चा झाली. देशमुख घराण्याची पन्नास-पंचावन्न वर्षांची काँग्रेसवरची निष्ठा ढळली... देशमुख राजी झाले. भाजपमधले दावेदार वाढले.हे एवढ्यावरच थांबलं, तर राजकारणं कसलं! पेठनाक्यावरच्या सम्राट महाडिकांनीही उमेदवारीवर दावा केलाय. कधीकाळी काँग्रेसचा हात हातात असणाºया महाडिक गटानं पक्षातल्या गटबाजीला कंटाळून आणि जयंतरावांना विरोध म्हणूूनच भाजपशी जवळीक साधलीय. आतापर्यंत ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वांना आम्ही मदत केली. यावेळी त्यांनी आम्हाला करावी, हे महाडिकांचं तर्कसंगत आवाहन! आता हा पैरा कसा फिटणार..?जाता-जाता : शिराळ्यात भाजपमधून शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक हे तिघे प्रबळ दावेदार. नवा चेहरा म्हणून देशमुखांना उमेदवारी द्यावी तर विद्यमान आमदार नाईक यांचा गट थांबणार का, नाईकांनाच पुन्हा चाल द्यावी तर देशमुखांचं पुनर्वसन कसं करणार, यंदा थांबायला तयार नसलेल्या महाडिकांना भाजपवाले कसं आवरणार, असे भाबडे प्रश्न काहींना पडताहेत. पण विधानसभेचं तिकीट, विधानपरिषदेची आमदारकी, महामंडळं आणि इतर काहीबाही पत्ते हातात असलेले चलाख भाजपवाले हा तिढा सोडवतीलही...ताजा कलम : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं शिराळा आणि इस्लामपूर मतदारसंघात प्रत्येकानं स्वतंत्रपणानं उठावदार स्वागत केलं. कारण इच्छुकांची संख्या खंडीभर. परिणामी शिस्तबद्ध गटबाजीचं दर्शन घडलं! आता कुठं त्यांचा पक्ष ‘काँग्रेसयुक्त भाजप’ होऊ लागलाय...