शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

Sangli: माजी नगरसेवकांचा ‘मिरज पॅटर्न’ कोणाच्या विकासाचा?, शहरातील प्रश्नांना कोलदांडा 

By अविनाश कोळी | Published: September 27, 2024 6:41 PM

सर्वपक्षीय एकजुटीमागे ‘अर्थ’कारण की स्वार्थकारण?

अविनाश कोळीसांगली : कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की, ‘मिरज पॅटर्न’चा पत्ता बाहेर काढला जातो. स्थानिक राजकारणात सर्वपक्षीय माजी नगरसेवकांच्या या पॅटर्नचा इतका मोठा दबदबा निर्माण करताना नागरिकांच्या प्रश्नांसाठी तो का केला जात नाही, हा सवाल अस्वस्थ करणारा आहे. संपूर्ण मिरज शहर सध्या विविध समस्यांनी ग्रस्त असताना त्यासाठी कधी हा पॅटर्न वापरल्याचे येथील जनतेला ऐकिवात नाही. त्यामुळे हा ‘अर्थ’कारणाचा पॅटर्न आहे की, राजकीय स्वार्थकारणाचा हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दिवंगत माजी आमदार एन. आर. पाठक यांच्या सामाजिक व राजकीय परंपरेची पार्श्वभूमी लाभलेल्या ऐतिहासिक मिरज शहरातील राजकारण दूषित होत आहे. कोणताही पक्ष पाठीशी नसतानाही लोकांच्या पाठबळावर निवडून येता येते हे सिद्ध करणाऱ्या राजकारणाची परंपरा मिरजेचीच. आताही स्वत:च्या ताकदीवर निवडून येणारे नेते मिरजेत असले तरी फरक केवळ जनतेच्या प्रश्नांच्या लढ्याचा आहे. ताकद असूनही त्याचा वापर जनतेसाठी करण्याऐवजी तो केवळ स्वार्थी राजकारणासाठी केला जावा, हे या परंपरेला छेद देणारे आहे.पक्ष कोणताही असला तरी एखाद्याला पराभूत करण्यासाठी किंवा एखाद्याच्या विजयासाठी शक्ती खर्च करणाऱ्या नेत्यांचा हा फोरम महापालिकेच्या स्थापनेपासून गठित झाला. त्यापूर्वीही अस्तित्व असले तरी त्यात फारसा जीव नव्हता. स्थानिक पातळीपासून आता लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत या पॅटर्नचा दबदबा निर्माण झाला आहे. राजकीय गोटात त्याचा धसकाही घेतला जातो. हा दबदबा लोकांच्या कामी येत नाही, हा या संघटनेचा कमकुवत दुवा आहे.

म्हणे मिरजेत विकासकामे झालीमिरज पॅटर्नमधील माजी नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना पाठिंबा देताना त्यांच्या विकासकामांचे दाखले दिले. इतकी विकासकामे झाली असतील तर मिरजेला राज्यातील सुंदर व विकसित शहराचा दर्जा मिळाला असता. असा सूर सामान्य जनतेतून उमटत आहे.

..तर निवडणुका हव्यात कशाला?भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं अशा सर्व गटातील माजी नगरसेवक, पदाधिकारी पालकमंत्र्यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटले होते. असे असेल तर कोणत्याच निवडणुका न लढविता सर्व निवडणुकाच याच सर्वपक्षीय पॅटर्ननुसार बिनविरोध कराव्यात. निवडणुका हव्यातच कशाला, असा सवाल काही नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

एक फाइलही हलत नाहीराज्यातील अनेक आमदारांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू केली आहे. अनेकांचे प्रश्न मार्गी लागलेही. सांगली, मिरजेच्या ड्रेनेजच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव महिनाभर शासनाकडे पडून आहे; पण त्याच्या मंजुरीची तसदी सत्ताधारी आमदारांना, पॅटर्न राबविणाऱ्या माजी नगरसेवकांना घ्यावीशी वाटत नाही.

हे प्रश्न कधी दिसत नाही का?

  • २४ कोटी रुपयांसाठी मिरजेची ड्रेनेज योजना रेंगाळली आहे.
  • १३ कोटी रुपये खर्च करूनही मध्यवर्ती भाजी मंडई उभारणी नाही
  • ७ कोटी रुपये खर्च करूनही छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा विकास नाही
  • अनेक वर्षांपासून गाजलेल्या छत्रपती शिवाजी रस्त्याचे काम अपूर्ण
  • शहराअंतर्गत खराब रस्त्यांचा प्रश्न अधांतरी
  • मिरजेचे शासकीय रुग्णालय सुविधांपासून वंचित
  • मिरज जंक्शन विकास व सुशोभीकरणाचे काम अद्याप सुरू नाही
  • मिरज-सांगली रस्त्यावर कृपामयीजवळ पर्यायी पुलाचा प्रश्न अधांतरी
टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा