शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

वसंतदादा कारखान्याच्या कर्जाचा बाऊ कशाला?

By admin | Published: April 17, 2016 10:54 PM

दिलीपतात्या पाटील : थकबाकी भरल्यानेच ते कर्जासाठी म्हणून पात्र

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने त्यांच्या यापूर्वीच्या कर्जाची सर्व थकित रक्कम भरली आहे. कर्ज भरणारा प्रत्येक कर्जदार हा पुढील कर्जासाठी पात्र ठरत असतो. त्यामुळे वसंतदादा साखर कारखान्याच्या नव्या कर्जमंजुरीचा बाऊ कशाला?, असा सवाल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी रविवारी उपस्थित केला. ते म्हणाले की, बँकेने सध्या बँकिंग धोरणांचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात झाली आहे. नवे वित्तीय वर्ष सुरू झाल्याने बँकेकडील पैशातून व्याज स्वरुपात उत्पन्न सुरू करण्यासाठी नव्या कर्ज प्रकरणांच्या मंजुरीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एखादा शेतकरी जेव्हा त्याचे कर्ज व थकबाकी भरतो, तेव्हा तो नव्या कर्जासाठी पात्र होतो. बँकिंग क्षेत्राचा हा नियमच आहे. त्याचपद्धतीने एखादी अकृषिक संस्था त्यांचे खाते नियमित करीत असेल, तर त्यांना कर्जपुरवठा केलाच पाहिजे. वसंतदादा कारखान्याने यावेळी त्यांची सर्व थकबाकी भरलेली आहे. कारखाना थकबाकीत असता, तर त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर होऊ शकले नसते. यापूर्वी ज्यावेळी कारखान्याचे खाते एनपीएमध्ये होते, त्यावेळी त्यांनी दिलेल्या कर्जप्रस्तावास आम्ही नकार दर्शविला होता. आता त्यांचे खाते नियमित झाल्याने नव्या कर्जासाठी ते पात्र ठरलेले आहे. कारखान्याला दिलेल्या नव्या कर्जातून पुन्हा व्याजस्वरुपात उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे यात बँकेचाच फायदा आहे. आशिया खंडातील हा सर्वात मोठा कारखाना असून त्यावर अनेक कामगारांचे जीवनही अवलंबून आहे. अशा मोठ्या संस्थेचे तसेच मोठा कर्जदार म्हणून त्यांचे हित पाहिल्यास, साहजिकच बँकेचाही त्यात फायदा आहे. त्यामुळे या कर्जप्रकरणाचा एवढा बाऊ करण्यात अर्थ नाही. बँकिंगच्या कारभाराचा हा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)