शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

धक्कादायक! घरगुती वादातून डोक्यात खोरे घालून पत्नीचा खून

By श्रीनिवास नागे | Published: September 06, 2022 11:33 AM

बऱ्याचवेळा किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होत होते.

सांगली : तासगाव तालुक्यातील विसापूर येथे पतीने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काजल बिरजू जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. घरगुती वादातून पती बिरजू जाधव याने काजल हिच्या डोक्यात खोरे घालून तिचा जीव घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काजलचा खून केल्यानंतर बिरजू पळून गेला आहे. आज, मंगळवारी पहाटे ही घटना घडली.काजल हिचा विवाह सात वर्षांपूर्वी आळसंद (ता. खानापूर) येथील बिरजू जाधव याच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. सुरुवातीची काही वर्षे दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही वर्षानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वादास सुरुवात झाली. बऱ्याचवेळा किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होत होते. संसार व माहेरच्या लोकांनी एकत्रित बसून अनेकवेळा दोघांमधील वाद मिटवले होते. मात्र, पुन्हा दोघांमध्ये वादावादी सुरू व्हायची.सततच्या वादामुळे सासरच्या लोकांनी काजलला महिनाभरापूर्वी विसापूर येथे माहेरी सोडले होते. वादावादीवेळी दोघांचे विषय घटस्फोटापर्यंतही गेले होते. दरम्यान, काल (सोमवारी) बिरजू हा काजल हिच्याकडे आला होता. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा वादास सुरुवात झाली. याच वादातून बिरजू याने काजलच्या डोक्यात खोरे घालून तिचा खून केला. खून केल्यानंतर बिरजू पळून गेला. तासगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस