शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
3
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
4
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
5
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
6
Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ
7
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
8
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
9
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
10
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
11
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
12
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
13
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
14
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
15
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
16
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
17
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
18
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
19
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
20
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

दुष्काळाच्या यादीतून चार तालुके वंचित ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना भेटणार; सांगलीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी शासनाकडे न्याय मागणार

By अशोक डोंबाळे | Published: October 20, 2023 5:47 PM

सांगली : यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. ...

सांगली : यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. मात्र जत, आटपाडी, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तालुक्यात कमी पाऊस होऊनही पावसाचे मूल्यांकन करणाऱ्या नागपूरच्या कंपनीकडून शासनाला चुकीची माहिती दिली आहे. म्हणूनच हे चार तालुके दुष्काळग्रस्त यादीतून बाहेर राहिले आहेत. या प्रश्नावर जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री खाडे बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.मंत्री सुरेश खाडे म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुष्काळाचे मूल्यांकन करण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. खरीप हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीमार्फत केले. जिल्हानिहाय दुष्काळ तीव्रतेचे निकष लागू झालेले तालुके निश्चित केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील तीन तालुक्यांना हे निकष लागू आहेत.मिरज, तासगाव आणि कडेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील सर्वांत कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यात सांगली जिल्ह्याचा समावेश असल्याचे सर्वश्रूत आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि खानापूर या तालुक्यात सर्वांत कमी पाऊस झाला आहे. परंतु, हे तालुके दुष्काळग्रस्त यादीतून शासनाने वगळल्याची बाब गंभीर आहे. क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी नागपूर येथील महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपयोजना केंद्राची निवड केली आहे.संबंधीत कंपनीने सखोल सर्वेक्षण करण्याची गरज होती. मात्र, चुकीची आकडेवारी त्यांनी शासनाकडे दिली आहे. यंत्रणा कशी चुकली, याबाबतचा जाब विचारला जाईल. जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार, आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना भेटून कंपनीच्या चुकीचा कारभार त्यांच्यासमोर मांडणार आहे.

सिंचन योजनांचे वीजबिल टंचाई निधीतूनजिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पिकांना पाण्याची गरज असल्याने सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी दिले जात असताना योजनांच्या वीजबिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु वीजबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढणार नाही. टंचाईच्या निधीतून वीजबिल भरण्याबाबतचा विचार सुरू आहे, असेही मंत्री खाडे म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेdroughtदुष्काळ