शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

तुकडा तांदळावरील निर्यातबंदी तातडीने मागे घ्या, किसान सभेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:16 PM

सरकारने पंधरवड्यापूर्वी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली

सांगली : केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घेण्याची मागणी किसान सभेने केली आहे. निर्यातबंदीमुळे भात उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचे म्हटले आहे.सरकारने पंधरवड्यापूर्वी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरही २० टक्के निर्यात कर लागू केला. त्यावर सभेने तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, कांदा, गहू आणि तांदळावर निर्यातबंदी लागू करून सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यावर्षी खरीप हंगामात भात उत्पादन घटून ६० ते ७० लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात दर वाढले आहेत.पशुखाद्य आणि इथेनॉल मिश्रणासाठी उपलब्धता घटल्याने निर्यातबंदी लागू केल्याचा युक्तिवाद सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र मुबलक तांदूळ उपलब्ध आहे. निर्यातबंदीची आवश्यकता अजिबात नाही. एकूण उत्पादनाच्या तुलनेत यंदा केवळ ४.५ ते ५ टक्के घट होणार आहे. सन २०२१-२२ मध्ये विक्रमी १३०२.९ लाख टन उत्पादन झाले होते. त्याआधीच्या वर्षी १२४३.७ लाख टन झाले होते. ही आकडेवारी पाहता निर्यातबंदीची गरज नाही. निवेदनावर डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले आदींच्या सह्या आहेत.कार्पोरेट कंपन्यांच्या नफ्यासाठीच निर्यातबंदीबफर स्टॉकसाठी १३५ लाख टन तांदूळ लागतो. प्रत्यक्षात अन्न महामंडळाकडे ४७० लाख टन साठा उपलब्ध आहे. गरजेपेक्षा ३३५ लाख टन अधिक उपलब्ध आहे. अतिरिक्त तांदळाचे काय करायचे, असा प्रश्न आहे. भाव पाडून कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यासाठीच निर्यातबंदी लागू केली आहे. ती मागे घेतली नाही, तर भात उत्पादक रस्त्यावर उतरतील असे किसान सभेने म्हटले आहे.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार