शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

‘शक्तिपीठ’ रद्दसाठी सांगलीतील महिलांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:50 IST

आजपर्यंत क्षीरसागर गप्प का होते?

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी बुधगाव (ता. मिरज) येथील महिला शेतकऱ्यांनी मंगळवारी स्वत:च्या रक्ताने पोस्टकार्ड लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली. आम्हाला भूमिहीन करून शक्तिपीठ महामार्ग कशासाठी करत आहे? असा सवालही महिलांनी उपस्थित केला आहे.बाधित शेतकऱ्यांची महिलासह बुधगाव येथील विठ्ठल मंदिरात बैठक झाली. या ठिकाणी एकत्र येऊन महिला शेतकऱ्यांनी आपले रक्त बाटलीत काढले व बोरुने माझी जमीन बागायती आहे. सर्व जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे माझी जमीन प्रस्तावित महामार्गासाठी द्यायची नाही. तसेच या महामर्गामुळे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागास महापुराचा धोका वाढणार आहे. सर्व देवस्थाने रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहिली.

किसानसभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही, असे विधान केले होते. तसेच कोल्हापूरमध्ये आमदार क्षीरसागर यांनीही शक्तिपीठ महामार्ग होणारच असे विधान केले आहे. आजपर्यंत क्षीरसागर गप्प का होते?. कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना रद्द केल्यानंतरही ते बोलले नाहीत? शक्तिपीठचे समर्थन करण्याचा आत्मविश्वास त्यांना आत्ताच कोठून आला? हिम्मत होती तर निवडणूक प्रचारात त्यांनी हे विधान करायचे होते.सर्व आमदारांशी चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणतायत मग सांगलीचे आमदार, खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसे सहभागी होतात. याचे उत्तर मुख्यमंत्री देतील काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठविली आहेत. ती त्यांनी वाचली नाहीत का? असे संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उमेश एडके, प्रवीण पाटील, आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, अनिल डुबल, रामदास पाटील, वैशाली पाटील सरपंच, शुभांगी शिंदे, उपसरपंच वनिता पाटील, तृप्ती पाटील, सुषमा पाटील आदी उपस्थित होते.

घरादारावर नांगर फिरविण्याची धोरण बदला : महेश खराडेविकासाच्या गप्पा मारून शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे राज्य सरकारची धोरण असून ते उधळून लावले जातील. विकासाचे कारण पुढे करुन शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नाही, असा आरोपही महेश खराडे यांनी केला.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गChief Ministerमुख्यमंत्री