शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

यशवंतरावांचे जन्मघर स्मारक दुर्लक्षितच- प्रतीक्षा ३५ वर्षांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:09 IST

अतुल जाधव । देवराष्ट : राजकारण करीत असताना समाजकारणाचा वसा घेऊन, कवडीचीही अपेक्षा न करता, राज्यासह देशाच्या उन्नतीसाठी आपले ...

ठळक मुद्देनिधीची तरतूद असूनही स्मारकाच्या कामात येतोय अडथळास्मारक पुरातत्व विभागाच्या ताब्यात, देखभाल प्रतिष्ठानकडे आणि निधी तिसरीकडेच

अतुल जाधव ।देवराष्ट : राजकारण करीत असताना समाजकारणाचा वसा घेऊन, कवडीचीही अपेक्षा न करता, राज्यासह देशाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या नवमहाराष्टचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट येथील जन्मघर स्मारक त्यांच्या मृत्यूनंतर गेल्या ३५ वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या स्मारकाची उपेक्षा संपणार कधी? हा प्रश्न चव्हाणप्रेमींना भेडसावत आहे.

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी देवराष्टÑेसारख्या छोट्याशा खेड्यात, अत्यंत गरीब आणि हलाकीच्या परिस्थितीत झाला. गरीब कुटुंबात जन्माला येऊन आणि कोणताही राजकीय वारसा नसतानाही संयुक्त महाराष्टÑाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. या नेत्याच्या देवराष्टÑे येथील जन्मघराचा प्रश्न कित्येक वर्षे रेंगाळत पडला आहे. येथील सि. स. नं. ५२५ मधील जन्मघराची इमारत शासनाच्या सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाने ८ फेबु्रवारी २००१ रोजी ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित केली. यानंतर पुरातत्व विभागाने मोडकळीस आलेल्या या जन्मघराची ६५ हजार रूपये खर्च करुन डागडुजी केली. मात्र याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर शासनाने जन्मघराची दुरुस्ती करण्यासाठी १० लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करुन दिला. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी बांधकाम करुन जन्मघरास पूर्वीची अवस्था प्राप्त करुन देण्यात आली. पुरातत्व खात्याने तेथे फलक लावून आपली जबाबदारी टाळली.

यशवंतरावांच्या जन्मघरासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी २ कोटी १७ लाखांचा आराखडा तयार करुन कामाला लवकरच सुरुवात करणार असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर याकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसत नाही. निधी उपलब्ध असूनही स्मारक पुरातत्व विभागाच्या ताब्यात, देखभाल प्रतिष्ठानकडे आणि निधी तिसरीकडेच, अशी अवस्था दिसत आहे. त्यामुळे स्मारक विकासाचे काम प्रलंबित आहे.शासन निर्णयाची प्रतीक्षाशासनाने हे स्मारक राज्यवैभव संगोपन योजनेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे पाच वर्षांसाठी देखभालीसाठी दिले होते. या कराराला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. करार वाढवून मिळावा, यासाठी प्रतिष्ठानने विनंती केली आहे. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नसल्याचे समजते. त्यामुळे सध्या हे स्मारक शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :SangliसांगलीYashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाण