शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Satara: कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; पायथा वीजगृहातून पाणी सोडले, कण्हेर, उरमोडीतूनही विसर्ग 

By नितीन काळेल | Published: August 27, 2024 12:27 PM

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातील पाणीपातळीही १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातील पाणीपातळीही १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढल्याने धरणाच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील कण्हेर, धोम, उरमोडी धरणातूनही पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.जिल्ह्यात आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतर पाऊस कमी झाला होता. तर आॅगस्टच्या मध्यावर पावसाने काही दिवस विश्रांती घेतलेली. मात्र, मागील पाच दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. २९ आॅगस्टपर्यंत जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मागील पाच दिवसांत तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत आहे. कोयना, नवजा, कास, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर या भागात संततधार आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडीसह तारळी धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.

मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३६ तर नवजाला १३९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तसेच महाबळेश्वरला १४२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक टिकून आहे. सकाळच्या सुमारास ३८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली. ९८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सायंकाळपर्यंत धरणसाठा १०० टीएमसीचा टप्पा पार करु शकतो. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी ११ पासून कोयना धरणातील पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करुन २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्याबाबत निर्णय झाला होता. परिणामी कोयना नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

धरणांमधून पुन्हा पाणी सोडले; नदीकाठी इशारा..कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील व पुणे जिल्ह्यातील वीर धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. यामुळे धरणात आवक वाढल्याने वीरमधून नीरा नदीपात्रात ४७ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. 

उरमोडी धरणातही पाणीसाठा वाढला. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून दरवाजातूनही सुमारे सहा हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. तर धरणाच्या वीजगृहातून ५०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. तर कण्हेर धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. यामुळे दरवाजातून विसर्ग वाढविण्यात आलेला आहे. धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना, नीरा, उरमोडी आणि वेण्णा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण