शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

दुष्काळाचा फटका; सातारा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना

By नितीन काळेल | Updated: January 29, 2024 18:48 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका खरीपनंतर आता रब्बी पेरणीवर झाला आहे. अवघी ८१ टक्के पेरणी झालेली ...

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका खरीपनंतर आता रब्बी पेरणीवर झाला आहे. अवघी ८१ टक्के पेरणी झालेली आहे. तर सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. त्याचबरोबर ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे.जिल्ह्यातील शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. चांगला पाऊस झाल्यास दोन हंगाम चांगल्यारितीने घेण्यात येतात. त्यातच जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. त्यानंतर रब्बी हंगाम असतो. मात्र, गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. सरासरीच्या ६५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला होता. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पेरणीवर परिणाम झाला. तसेच उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार हेक्टरवर निश्चित करण्यात आले होते. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र होते. त्यानंतर गव्हाचे ३७ हजार हेक्टर, हरभरा २७ हजार हेक्टरवर होते. या तीन प्रमुख पिकांशिवाय मका, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस घेणारे शेतकरी आहेत. पण, या पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे. जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने रब्बीच्या पेरणीवरही परिणाम झाला आहे.कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार ८१.१२ टक्केच पेरणी झालेली आहे. त्यामुळे १ लाख ७२ हजार ९५० हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. यामध्ये प्रमुख पीक असणाऱ्या ज्वारीची १ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. ७६ टक्क्यांवर ही पेरणी आहे. तर गव्हाची सुमारे ३३ हजार हेक्टरवर पेर आहे. पेरणीची टक्केवारी ८८ इतकी आहे. हरभऱ्याची ७७ टक्के क्षेत्रावर पेर आहे. म्हणजे, २१ हजार ३३९ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तसेच मकेला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मका क्षेत्रात वाढ झालेली आहे. कृषी विभागाने १० हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते. प्रत्यक्षात १४ हजार हेक्टरवर मका घेण्यात आलेली आहे. मकेची पेरणी टक्केवारी १३८ इतकी आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता नाही. दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धततेचा विचार करुन रब्बी हंगाम पेरणी केलेली आहे. तसेच पेरणी होऊनही पिकांना पाणी कमी पडत असल्याने पीक उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

माण तालुक्यात ६५ टक्केच पेरणी..

जिल्ह्यात सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातच रब्बी हंगामात १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. साताऱ्यात १५ हजार ४९२ तर कऱ्हाडला सुमारे १५ हजार हेक्टवर रब्बी पिके आहेत. तर सर्वात कमी पेरणी माण तालुक्यात झालेली आहे. ४६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३० हजार हेक्टरवरच पेर झाली. माणमधील पेरणीची टक्केवारी ६५ इतकीच आहे. तर जावळी तालुक्यात ७९ टक्के, पाटण ८८, कोरेगाव ७५, खटाव ७३ टक्के, फलटण ८८, खंडाळा ८०, वाई ८४ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

खरीपात १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामावरही दुष्काळी सावट होते. त्यामुळे खरिपाची ९३ टक्केच पेरणी झालेली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले होते. आता रब्बीतही मोठ्या प्रमाणात क्षेत्र पेरणीविना आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी