शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

वळसे येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ५० एकर ऊस खाक, लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 7:02 PM

वाऱ्यामुळे आगीची तीव्रता खूप जोराची असल्यामुळे आणि अग्निशमन बंबास शेतामध्ये येण्यास व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या.

नागठाणे : नागठाणे परिसरातील वळसे येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गावातील जवळपास ३० शेतकऱ्यांचा ४५ ते ५० एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वळसे येथील पालेकर कंपनीचे मागील शेतातील नारगौंडी भागातील विहिरीजवळ शनिवारी दुपारी शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत जवळपास ३० शेतकऱ्यांचा ४५ ते ५० एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतू, वाऱ्यामुळे आगीची तीव्रता खूप जोराची असल्यामुळे आणि अग्निशमन बंबास शेतामध्ये येण्यास व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या. यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या महिन्यातच भरतगाव येथेही काही शेतकऱ्यांचा जवळपास १५ एकर ऊस आगीत जळाला होता. ही घटना ताजी असतानाच या महिन्यात पुन्हा अशीच भीषण घटना घडली आहे. या भीषण घटनेमध्ये वळसे येथील ३० शेतकऱ्यांचे मिळून ४५ एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचे स्पष्ट झाले असल्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग