शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

साताऱ्यात ५० जणांचे उमेदवारी अर्ज मागे

By admin | Published: November 11, 2016 10:46 PM

पालिका निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवकपदांच्या ४० जागांसाठी तब्बल १९0 उमेदवार रिंगणात

सातारा : पालिकेच्या निवडणुकीतून तब्बल ५० जणांनी शुक्रवारअखेर माघार घेतली आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपली असल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ जणांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर ४० नगरसेवक पदांसाठी ४६ जणांनी माघार घेतल्याने १९० उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. पालिका निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गतनिवडणुकीत तब्बल १७ जागा बिनविरोध करण्यात मनोमिलनातील साविआ व नविआ या दोन्ही आघाड्यांना यश आले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र चित्र उलटेच पाहायला मिळत आहे. सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या सत्ताधारी आघाड्या एकमेकांविरोधात ठाकल्या असून, भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नागरी विकास आघाडी यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही आघाड्यांतील बंडखोरांसह अपक्षांनीही आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत शुक्रवारी संपणार होती. त्यामुळे अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण ती फोल ठरली. २ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर ९ दिवसांच्या कालावधीत अवघ्या ५० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वत: उमेदवारांशी चर्चा केली. अनेक उमेदवार या चर्चेनंतर उदयनराजेंसोबत त्यांच्या गाडीतून पालिकेत दाखल होऊन उमेदवारी अर्ज मागे घेत होते. नगराध्यक्षपदासाठी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक यांच्यासह माधुरी भोसले, आरती काटे, सुजाता राजेमहाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेतली. धनश्री महाडिक, भारती सोळंकी यांनी दमयंतीराजे भोसले यांच्यासोबत गाडीतून येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतले. गत निवडणुकीत विरोधी बाकावर बसलेले नगरसेवक कल्याण राक्षे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातर्फेही नगरविकास आघाडीच्याविरोधातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भाने हालचाली सुरू होत्या. अनेक अपक्षांनी माघार घेतल्याचा दावा नगरविकास आघाडीतर्फे करण्यात आला. उमेदवार धावला... पण वेळ संपली ! अर्ज माघारी घेण्यासाठी एक उमेदवार काही मोजक्याच कार्यकर्त्यांसह पालिकेत धावतच आला. मात्र मुदत संपल्याने त्याची उमदेवारी कायम राहिली..आता लढूया..पडतील तेवढी मतं पडतील, असं म्हणून त्याच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला सावरलं.. सातारा पालिकेतील मनोमिलन दुभंगल्याच्या निमित्ताने अनेकांच्या राजकीय इच्छा आकांक्षांना बळ मिळाले. गल्लो-गल्लीतून अनेकजण निवडणूक लढविण्यास इच्छुक झाले. काहीजण पालिकेच्या कारभारावर ठपका ठेवत तर काहीजण ‘काहीतरी’ मिळेल या आशेने रिंगणात उतरले. ज्यांना आपले ध्येय साध्य झाले, असे वाटले त्यांनी मुदतीपूर्वीच अर्ज माघारी घेतले. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ‘वाटाघाटी’मध्ये व्यस्त असलेल्या काही उमेदवारांना कोणीच दाद दिली नसल्याचे शुक्रवारी पालिकेत पाहायला मिळाले. अर्ज माघारी घेण्याची मुदत दुपारी तीनपर्यंत होती. तीनला दहा मिनिटे बाकी असताना निवडणूक कर्मचाऱ्याने मुदत संपत असल्याचे निवेदन वाचून दाखविले. बरोबर तीनच्या काट्यावर सभागृहातील दरवाजा बंद केला गेला. आतील लोकांना बाहेर अन् बाहेरील लोकांना आतमध्ये सोडले जात नव्हते. तीन वाजून दहा मिनिटांनी एक अपक्ष उमेदवार धापा टाकतच पालिकेत आला. यावेळी त्याच्यासोबत चार ते पाच मोजकेच युवक होते. बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांनी त्याला वेळ निघून गेल्याचे सांगितले. हे ऐकून त्याचा चेहरा हिरमिसूला झाला. ‘चलं रे काही होत नाही..लढू निवडणूक.. किती मतं पडतील ते पडतील,’ असं म्हणून त्याचे मित्र त्याला सावरत होते. तुम्हाला मी सांगत होतो ना की त्याचा फोन येणार नाही म्हणून तुमच्यामुळेच वेळ झाला, असा संताप तो उमेदवार व्यक्त करत होता. खरंतर त्या उमेदवाराला निवडणूक लढवायचीच नव्हती, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. त्याच्या चार-दोन मित्रांनी त्याला हुलीवर बसविले होते. काहीवेळानंतर तो अपक्ष उमेदवार आणि त्याचे मित्र पालिकेतून निघून गेले. (प्रतिनिधी)