शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

५० वर्षांनंतरही नागरी सुविधांचा प्रश्न

By admin | Published: November 30, 2015 9:27 PM

गाढवली ग्रामस्थ : कोयना धरणासाठी केळघरजवळ गावाचे पुनर्वसन

कुडाळ : कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या गाढवली पुनर्वसन येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून चालढकल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणासाठी आपली जागा देऊनदेखील गेल्या पन्नास वर्षांत प्रशासनाने नागरी सुविधांचे प्रश्न न सोडवल्याने आम्हाला विकासापासून अजून किती काळ वंचित ठेवणार आहात? असा सवाल गाढवली पुनर्वसन येथील ग्रामस्थांनी केला आहे.१९६२ मध्ये कोयना धरणाचे काम सुरू झाले होते. त्यावेळी तापोळा विभागातील गाढवली या गावाचे केळघरजवळ कुरळोशी गावच्या पश्चिमेस पुनर्वसन झाले होते. त्यावेळी धरणासाठी गाढवलीच्या ग्रामस्थांनी आपला जमीनजुमला, स्थावर मालमत्ता, घरेदारे यावर पाणी सोडून स्थलांतर केले होते. आज या घटनेला अनेक वर्षे झाली आहेत.ग्रामस्थांच्या या असीम त्यागाची गेल्या पन्नास वर्षांपासून प्रशासनाकडून बोळवण होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुनर्वसित गावाला अठरा नागरी सुविधा देणे बंधनकारक असताना गाढवलीतील प्रश्नांबाबत मात्र प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. येथे पुनर्वसनाच्या अठरा नागरी सुविधांतर्गत संपूर्ण गावातील अंतर्गत रस्ते, टप्प्याटप्प्यांवर तीन मीटर उंचीच्या आरसीसी संरक्षण भिंती, स्मशानभूमी शेड बांधकाम, अंतर्गत गटारे, पिण्याच्या पाण्याची सोय ही कामे प्राधान्यक्रमाने करावीत, याबाबतचे लेखी पत्रही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कृष्णा खोरेला दिले होते. आमदारांच्या लेखी पत्राचीही दखल घेतली जात नसल्याचे गाढवलीचे उपसरपंच बबनराव शिंदे यांनी सांगितले. गाढवली पुनर्वसन येथे ८५ लाखांची विकासकामे प्रस्तावित असताना कृष्णा खोरेकडून वेळकाढूपणा केला जात असल्याबाबत गाढवलीच्या ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासकामांची पाहणी, सर्वेक्षण तसेच अंदाजपत्रक तयार करून कृष्णा खोरेचे अधिकारी गावातून गेले आहेत. मात्र, सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामे मार्गी न लागल्याने नागरी सुविधा कधी मिळणार, या प्रतीक्षेत गाढवलीचे नागरिक आहेत. (प्रतिनिधी)