शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
3
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
4
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
5
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."
7
Oral cancer चे निदान टूथब्रशद्वारे लागणार, IIT Kanpur मध्ये बनवलेले डिव्हाईस लवकरच बाजारात येणार!
8
नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा
9
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
10
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा
11
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
12
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
13
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
14
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
15
"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार
16
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
17
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
18
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
19
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
20
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!

जिल्ह्यातील ५७ विनाअनुदानित शाळा बंद!

By admin | Published: October 06, 2016 11:27 PM

शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : औरंगाबाद येथे शिक्षकांवरील हल्ल्याचा निषेध

सातारा : औरंगाबाद येथील मंगळवारी आयोजित मंत्रिमंडळ बैठकीवेळी मोर्चा दरम्यान पोलिसांनी लाठीहल्ला केला, असा आरोप करत या घटनेच्या निषेधार्थ विनाअनुदानित शाळा मुख्याध्यापक संघाने गुरुवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. यामध्ये जिल्ह्यातील ५७ शाळा सहभागी झाल्या.औरंगाबादमध्ये मंगळवारी शिक्षकांनी मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले. यात २१ शिक्षक व १३ पोलिस जखमी झाले. पोलिसांनी शिक्षकांवर लाठीहल्ला केला, असा आरोप करत विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी गुरुवारी राज्यातील शाळा बंद करण्याची हाक दिली होती. यामध्ये जिल्ह्यातील ५७ शाळा सहभागी झाल्या. विनाअनुदानित शाळा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकाऱ्यांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी देवीदास कुळाल यांची भेट घेऊन बंदमध्ये ५७ शाळा सहभागी झाल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी) विनाअनुदानित शिक्षकांची परवड : देवीसातारा : ‘औरंगाबाद येथे विनाअनुदानित शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याने विनाअनुदानित शिक्षण व्यवस्थेची राज्यभर चाललेली परवड पुन्हा उजेडात आली आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नावाखाली गल्लाभरू शिक्षण संस्थांची संस्थाने निर्माण झाल्याने शिक्षण व्यवस्थेची राज्यभर हेळसांड सुरू आहे,’ असे मत शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षक संघटना (सुटा)चे जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय देवी यांनी व्यक्त केले. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देवी यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद घटनेमुळे तंत्रनिकेतने अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत सेवकांच्या हालअपेष्टांना कोणीही वाली नसल्याचे स्पष्टपणे नजरेस येत आहे. सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरील फी, आर्थिक मागासलेपणाचे हास्यास्पद निकष व आरक्षणाच्या मर्यादेत न बसणारी गुणवान; पण वंचित पिढीने या महागड्या शिक्षण व्यवस्थेकडे पाठ फिरविली आहेच. मागेल त्याला महाविद्यालये देण्याच्या विधी निषेध शून्य धोरणाने तसेच मागणी व पुरवठा यांचा कोणताही ताळमेळ न लावता पुस्तकी गणितावर अव्यवहारी अर्थशास्त्र मांडणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी या क्षेत्रात धुमाकूळ माजवला आहे. एकीकडे खर्चावर आधारित फी ठरविण्याच्या उदात्त धोरणाला प्रचंड गळती लागल्याने ‘दिले घेतले’ प्रवृत्ती फोफावली अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. नवे, जुने शिक्षणसम्राट तयार झाले. त्यागाच्या नावाखाली खंडणीखोरी सुरू झाली आणि शिक्षणाचा गाभाच हरविला आहे.’ धंदेवाईक नफेखोर ओरबाडूप्रवृत्ती व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेकडे वळल्या आणि व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेची संपन्नाव्यवस्था विपदा झाली. हातात एक व कागदावर एक ही वेतनाची अभिनवपद्धती रुळावली तरीही चार-सहा महिन्यांपर्यंत वेतन रखडलेलेच आहे. प्रचंड फी देऊन शिकूनही वा देणगी देऊन नोकरी टिकविण्याची शाश्वती नसल्याने आता व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेची वाटचाल शैक्षणिक अराजकतेकडे सुरू आहे. समाजापुढे ‘कमवा शिका’ योजनेद्वारे आदर्श निर्माण करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने या व्यवस्थेच्या राष्ट्रीयीकरणासाठी सर्वसमावेशक नेतृत्व करण्याची व ‘केजी टू पीजी’ मोफत शिक्षणव्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे,’ असेही देवी यांनी पुढे म्हटले आहे. (प्रतिनिधी)